नाशिक जिल्ह्यात मे महिन्याच्या उत्तराधार्थ सुरू झालेल्या अवकाळी पावसाने बळीराजापुढे मोठे संकट उभे केले आहे. बाजारभाव मिळत नसल्याने शेतातच साठवून ठेवलेला कांदा ओल्या हवामानामुळे सडला असून यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
नाशिक जिल्ह्यातील लासलगाव शहरात काल (सोमवार) सायंकाळी विजांच्या कडकडाटासह झालेल्या वादळी वाऱ्यांनी आणि मुसळधार पावसाने मोठा कहर माजवला. या हवामानाने अक्षरशः चक्रीवादळाची अनुभूती दिली.
या मुसळधार पावसामुळे कांदा व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कांद्याचे शेड कोसळल्यामुळे शेकडो क्विंटल कांदा भिजला असून व्यापाऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
याशिवाय, शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यांवर झाडे उन्मळून पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. मुख्य बाजारपेठांतील दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे अनेक दुकानदारांचे माल भिजून नुकसान झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.