येवला: सलग पाचव्या वर्षी खरीप हंगामाच्या तोंडावर बियाण्यांच्या दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. नाशिक जिल्ह्यात सुमारे ४० टक्के क्षेत्रावर घेतल्या जाणाऱ्या मक्याच्या बियाण्याच्या दरात यंदा १०० ते ३५० रुपयांची वाढ झाली आहे. साडेतीन ते चार किलोच्या थैलीसाठी आता शेतकऱ्यांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत.
मका व्यतिरिक्त मूग, तूर, बाजरी यांसारख्या बियाण्यांच्या दरातही ५० ते १०० रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूणच करोडो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
बियाण्यांच्या या वाढत्या किमतीमुळे शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च प्रचंड प्रमाणात वाढले असून शेतीसाठी लागणारे भांडवल आता तापदायक ठरत आहे. आधीच बदलते हवामान, कीड-रोगांचा प्रादुर्भाव आणि बाजारपेठेतील अनिश्चितता या समस्यांनी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना आता बियाण्यांच्या दरवाढीने आणखी अडचणीत टाकले आहे.
शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शासनाने बियाण्यांच्या दरवाढीवर नियंत्रण ठेवावे आणि अनुदानाच्या स्वरूपात तातडीने मदत करावी, अशी मागणी जिल्ह्यातील कृषी संघटनांकडून करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.