जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून मोठ्या कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या 24 तासांतील घडामोडींमुळे ही शक्यता अधिक बळावली आहे. सूत्रांनुसार, भारत सीमापार सर्जिकल स्ट्राईकसारखी मोहीम पुन्हा राबवू शकतो.
2016 आणि 2019 मध्ये अशा मोहिमांमध्ये 500 पेक्षा अधिक पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पवित्रा आक्रमक घेतला आहे. भारताने पाकिस्तान विरुद्ध मोठं पाऊल उचलंल आहे. त्यामुळे आता पाकिस्तान सरकार धास्तावली आहे. भारत सर्जिकल स्ट्राईकसारखी कारवाई करु शकते ही भीती आता पाकिस्तान सरकारला आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आज सुरक्षा समितीची बैठक बोलावली आहे. तर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, आम्हाला आशा आहे की भारत सर्जिकल स्ट्राईकसारखं कोणतंही पाऊल उचलणार नाही. एकंदरीच पाकिस्तानचे आता पाकिस्तानला भीती बसली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.