India-Pakistan War  saam tv
Video

Atul Bhagare: भारत-पाकिस्तान युद्ध ३६ तासांत पेटणार; ज्योतिषाचार्य अतुल भगरे नेमकं काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Astrologer Atul Bhagare: जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारत कोणत्याही क्षणी पाकिस्तानवर हल्ला करू शकतो. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध ज्योतिषी भगरे गुरुजी यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे.

Omkar Sonawane

पहलगाम घटनेनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धसदृश्य वातावरण निर्माण झाले आहे. सध्या सीमेवर तणावाचे वातावरण आहे. येत्या ३६ तासांत भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध होण्याची शक्यता असल्याची भविष्यवाणी ज्योतिषाचार्य अतुल भगरे यांनी आज केली आहे.

भारताची रास मकर असून सध्या शनी तिसऱ्या स्थानी आहे. भारताची साडेसाती २९ मार्चला संपली आहे, त्यामुळे देशाचे ग्रहमान अनुकूल आहे. जर युद्ध झाले, तर त्यामध्ये भारताची बाजू प्रबळ राहील, असेही त्यांनी सांगितले.

मे महिन्यात भारताचे तीन ग्रह बदलणार आहेत. या दरम्यान भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात घडामोडी होण्याची शक्यता आहे. युद्ध झाल्यास सर्वात मोठे नुकसान पाकिस्तानचे होईल. पाकिस्तानचा काही भूभाग भारताकडे येण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, येत्या ३६ तासांत भारत-पाकिस्तान सीमेवर युद्ध सुरू होण्याची शक्यता असून, दोन्ही देश समोरासमोर ठाकले, तर हे तिसऱ्या महायुद्ध होऊ शकते, असेही ज्योतिषाचार्य भगरे गुरुजी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar : 'देवाभाऊ' नेपाळमध्ये काय झालं बघा; शरद पवारांनी शेतकऱ्यांचा प्रश्नांवरून सरकारवर ओढले आसूड

Maharashtra Live News Update: बीड जिल्ह्यात हेलिकॉप्टरच्या साह्याने पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांचे रेस्क्यू

Parbhani Rain: परभणीत पावसाचा हाहाकार, गोदावरी नदीला पूर; गावकऱ्यांचा तराफ्यावरून प्रवास| VIDEO

Navi Mumbai Airport : वाह! नवी मुंबई विमानतळाचे इनसाईड फोटो पाहून मन भरून येईल

दिवाळीपूर्वी कुंभ राशीसह 'या' तीन राशींना होणार फायदा, शनीचा नक्षत्रात होणार बदल

SCROLL FOR NEXT