पहलगाम घटनेनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धसदृश्य वातावरण निर्माण झाले आहे. सध्या सीमेवर तणावाचे वातावरण आहे. येत्या ३६ तासांत भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध होण्याची शक्यता असल्याची भविष्यवाणी ज्योतिषाचार्य अतुल भगरे यांनी आज केली आहे.
भारताची रास मकर असून सध्या शनी तिसऱ्या स्थानी आहे. भारताची साडेसाती २९ मार्चला संपली आहे, त्यामुळे देशाचे ग्रहमान अनुकूल आहे. जर युद्ध झाले, तर त्यामध्ये भारताची बाजू प्रबळ राहील, असेही त्यांनी सांगितले.
मे महिन्यात भारताचे तीन ग्रह बदलणार आहेत. या दरम्यान भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात घडामोडी होण्याची शक्यता आहे. युद्ध झाल्यास सर्वात मोठे नुकसान पाकिस्तानचे होईल. पाकिस्तानचा काही भूभाग भारताकडे येण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, येत्या ३६ तासांत भारत-पाकिस्तान सीमेवर युद्ध सुरू होण्याची शक्यता असून, दोन्ही देश समोरासमोर ठाकले, तर हे तिसऱ्या महायुद्ध होऊ शकते, असेही ज्योतिषाचार्य भगरे गुरुजी म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.