पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन सिंदूर भारतीय सैन्याद्वारे राबवण्यात आले. मध्यरात्री दीड वाजता हवाई दलाकडून भारताने पाकिस्तानातील मुजफ्फाराबाद, कोटली, गुलपूर आणि बिंबर, सियालकोट, चक अमरु, मुरीदके, बाहावलपूर अशा नऊ ठिकाणी एअर स्ट्राइक केली. यामध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
दरम्यान भारताकडून करण्यात आलेल्या कारवाईचे छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी स्वागत केले आहे. जलील म्हणाले, दहशतवादी हल्ल्याने पाकिस्तानला धडा शिकवण्याची खूप गरज होती. ते त्यांनी करून दाखवले आहे. हे करताना भारतीय सैन्याने सामान्य नागरिकांना कुठलाही त्रास होऊ नये याची काळजी घेतली. आपल्या देशाची संस्कृती आहे ती वेगळी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्या लढाया व्हायच्या ते महिलांना आणि मुलांना कधीही टार्गेट करत नव्हते ते फक्त दुश्मणांना टारगेट करायचे असंच भारतीय सैन्याने ही संस्कृती कायम ठेवली असे बोलत त्यांनी भारतीय सैन्याचे अभिनंदन केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.