राज्यात सर्वसामान्य नागरिकांना आता वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे. महावितरणने तूट भरून काढण्यासाठी पुढच्या पाच वर्षांच्या वीज दरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर करण्यात आला आहे. जर तुमचा वीजेचा वापर हा ३०० युनिट आहे, तर वर्षाच्या बिलात ९ हजारांपेक्षा जास्त रुपयांनी वाढ होईल. ५०० युनिट वापरणाऱ्यांच्या बिलात थेट २८ हजार रुपयांची वाढ होणार आहे. मात्र जर वीजेचा वापर हा १०० युनिट असेल तर अशा ग्राहकांचं वीजबिल कमी होणार आहे.
३०० युनिटसाठी सध्या वर्षाला साधारण ३ हजार ७२७ रुपये आहे. विजबिल दरवाढीनंतर ४ हजार ५४१.४० इतकं होणार आहे. ५०० युनिटसाठी सध्या ७ हजार ६२९.३२ इतकं वार्षिक बिल आहे. दरवाढीनंतर ९ हजार ९९३.४० रुपये इतकं हे बिल होणार आहे. तर १०० युनिटसाठी वर्षाचं बिल सध्या ८८२.७६ रुपये आहे. त्यात कपात होऊन हे बिल वर्षाला ८२७.०८ रुपये होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.