पालघर: गेल्या काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यात पावसाने तुफान बॅटिंग केली आहे. अनेक जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला आहे.त्यामुळे धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यातही मोठ्या प्रमाणात वाढ झालीये. त्याचप्रमाणे पालघरमधील सूर्या प्रकल्पातील धामणी धरण हे 78 टक्के भरलं आहे. आज या धरणाचे 3 दरवाजे उघडण्यात येणार असून पाण्याचा विसर्ग सूर्या नदी द्वारे करण्यात येणार आहे. गेल्या 5 दिवसांपासून पालघरमध्ये (palghar Hevay Rain) मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं आहे. धरण क्षेत्रात पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.