Massive sea waves batter Velas Beach road in Ratnagiri, causing erosion and roadblocks; access to the eco-tourism village is now cut off. Saam Tv
Video

Velas Beach: अरबी समुद्राच्या उधाणाने रत्नागिरीतील वेळासचा रस्ता खचला; कासव पर्यटनाला फटका|VIDEO

Velas Village Disconnected: रत्नागिरीतील वेळास किनाऱ्यावर समुद्राच्या लाटांचा जोर वाढला असून किनाऱ्यावरील संरक्षक भिंतींचे नुकसान झाले आहे. वेळासकडे जाणारा रस्ता खचल्यामुळे कासव पर्यटन पूर्णतः ठप्प झाले आहे.

Omkar Sonawane

पाऊस आणि अरबी समुद्राला आलेली मोठी भरती यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास किनाऱ्याला मोठ्या लाटांचा सामना करावा लागतो आहे. कासव पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या वेळास गावाकडे जाणाऱ्या किनाऱ्यावरील रस्त्याची लाटांमुळे मोठी दुरवस्था झाली आहे. बाणकोटपासून सुमारे तीन किलोमीटर वेळासला जोडणारा हा रस्ता समुद्रातील कचरा साचल्यामुळे वाहतुकीस बंद झालेला आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मोठ्या लाटांचे पाणी काही प्रमाणात किनाऱ्यावरून आता शिरलेले होते. वेळास हे पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले गाव आहे. मात्र दोन दिवसांपासून आलेल्या लाटांनी किनाऱ्यावरील जुन्या संरक्षक भिंतींचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे वेळास गावाकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

SCROLL FOR NEXT