उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विमानतळाबाहेर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपचे आमदार अनिल देशमुख यांच्यावर लागलेल्या आरोपांविषयी भाष्य केलं. 'चांदीवाल आयोगाचा अहवाल हा महाविकास आघाडीच्या काळातच सबमिट झाला आहे. त्यावर तेव्हा काय कारवाई का नाही केली. तो त्यांनी का जाहीर केला नाही. याचं उत्तर दिलं गेलं पाहिजे', अशी मागणी फडणवीसांनी केली. अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना त्यांच्यावर आरोप लावले. विरोधी पक्ष नेत्याच्या म्हणण्यावर स्टँडिंग गृहमंत्र्यावर एखादा कमिशनर आरोप लावेल असं शक्य आहे का? असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला. 'अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप कपोलकल्पित, त्यात काही अर्थ नाही' असल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. अनिल देशमुख यांच्यावर केस रजिस्टर करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले. हायकोर्टाने ती केस सीबीआयला सोपवली, तिथे कुठेही केंद्र सरकारचा संबंध नाही आणि राज्य सरकार मध्ये मविआ सत्तेत होते. ज्यावेळेस ते कोर्टात गेले त्यावेळी कोर्टाने दिलेले निर्णय आपण बघितले, तर या सर्व गोष्टी स्पष्ट होईल. 'मी यावर वारंवार बोलत नाही, अशा पद्धतीने रोज काहीतरी बोलत असतील, त्यांना उत्तर देऊन त्यांच्या स्तरावर जाण्याची माझी इच्छा नाही. सत्य सगळ्यांना माहित आहे सत्य पुढे येत राहील, असं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.