CMO responds strongly to Ambadas Danve’s allegations over the Chief Minister’s Relief Fund, intensifying the political debate in Maharashtra. Saam Tv
Video

Maharashtra Politics: अंबादास दानवेंवर कारवाई होणार? CMOचं सूचक ट्विट, नेमकं प्रकरण काय? VIDEO

Relief Fund Row: अतिवृष्टीनंतर शेतकरी मदतीवरून अंबादास दानवे यांनी केलेल्या गंभीर आरोपांवर सीएमओने ट्विट करत स्पष्टीकरण दिले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ६१ कोटी रुपयांची मदत वितरित झाल्याचा दावा सरकारने केला असून चुकीची माहिती देणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचेही सांगितले आहे.

Omkar Sonawane

राज्यात अतिवृष्टीमुळे बळीराजाचा तोंडाशी आलेला घास हा हिसकावून घेतला गेला होता. झालेल्या नुकसानीची सर्वच मंत्री महोदयांनी शेताच्या बांदावर जाऊन पाहणी केली आणि शेकडो कोटींच्या घोषणांचा पाऊस पाडला. तसेच अनेक सामाजिक संस्था आणि सामान्य नागरिकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत केली. तसेच या मदतनिधीमधून शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे ही सांगण्यात आले होते. मात्र आरटीआयमधून मिळालेल्या माहितीने विधिमंडळ सभागृहात आज चांगलाच गदारोळ पाहायला मिळाला. विधानपरिषदेचे माजी विरोधीपक्ष नेते तथा ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी ट्विट करून धक्कादायक आकडेवारी समोर आणली. याच ट्विटला सीएमओ कार्यालयाने उत्तर दिले आहे.

देवेंद्र फडणवीस हे दानशूर राज्याचे कंजूष प्रमुख ठरले आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी लोकांनी मुख्यमंत्री सहायता निधीत ऑक्टोबर महिन्यात अब्जावधी रुपये पाठवले. पण राज्याच्या प्रमुखांनी खर्च केले मात्र ७५ हजार रुपये. हा पैसा अडचणीतील लोकांना मदत देण्यासाठी आहे. सरकारला बहुदा हा त्यांच्या उद्योजक मित्रांनी दिलेला इलेक्शन फंड वाटतो आहे का? असे ट्विट करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

याला लगेचच सीएमओने ट्विट करत प्रत्युत्तर दिले आहे.

श्री अंबादास दानवे जी,

एकट्या ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारी देऊन निव्वळ गैरसमज निर्माण होतात. याशिवाय ही माहिती सुद्धा चुकीची आहे. अशी चुकीची माहिती का देण्यात आली, याचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे, त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.

मुख्यमंत्री सहायता निधीतून ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या काळात वितरित मदत 61 कोटी 51 लाख 698 रुपये इतकी आहे.

मुख्यमंत्री सहायता निधीतून दैनंदिन पातळीवर खर्च होतो. त्यामुळे दररोज या खर्चाची रक्कम ही वाढत असते. त्यामुळे फक्त एका महिन्याची माहिती सांगून निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल.

शिवाय शेतकऱ्यांना केवळ मुख्यमंत्री सहायता निधीतूनच मदत दिली जाते असे नाही, तर मदत आणि पुनर्वसन विभागासह विविध खात्याकडून सुद्धा दिली जाते. आतापर्यंत विशेष पॅकेजमधून 14,000 कोटींपेक्षा अधिकची रक्कम प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली आहे आणि अजूनही ही प्रक्रिया सुरूच असल्याने त्यातही सातत्याने वाढ होत असते. असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अजित पवारांचं टेन्शन वाढलं; ऐन निवडणुकीत मित्रपक्षाने पाठिंबा काढून घेतला

Realme 16 Pro: 200MP चा कॅमेरा आणि 7000mAh बॅटरी, स्पेशल युवा वर्गासाठी रियलमीने लाँच केली 16 Pro सिरीज

Maharashtra Live News Update: - अहिल्यानगर नावावरून राजकारण तापलं, संग्राम जगतापांचं मुख्यमंत्र्यांसमोर जनतेला आवाहन

Sangli Politics: ऐन निवडणुकीत अजित पवारांना मोठा धक्का; उमेदवारावरच थेट हद्दपारीची कारवाई

ठाकरे कुटुंब आमचे मतदार, शिंदेंचा उमेदवार प्रचारासाठी थेट मातोश्रीवर, नेमकं काय घडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT