कालपासून राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रीमंडळ राज्यातल्या नुकसानग्रस्त भागांचा बांधावर जाऊन आढावा घेत आहेत.तर आजही बीड जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. सकाळी मौजे, पिंपळगाव घाट येथून त्यांच्या दौऱ्याची सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे आणि पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याची थेट माहिती घेण्यासाठी अजित पवारांनी बाधित भागांना भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. ते प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न आणि अडचणी जाणून घेत आहेत. जिल्ह्यातील अनेक पिके उध्वस्त झाली असून शेतकरी हतबल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारकडून मदत तातडीने मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.