वरळी बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे चावीवाटप 14 ऑगस्ट रोजी होणार आहे.
556 लाभार्थींना घरांच्या चाव्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते दिल्या जातील.
व्यासपिठावर उपमुख्यमंत्री शिंदे, अजित पवार आणि वरळी आमदार आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत.
ठाकरे आणि शिंदे एकाच मंचावर असल्याने राजकीय चर्चांना जोर मिळाला आहे.
वरळी बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे चावीवाटप कार्यक्रम 14 ऑगस्ट रोजी होणार आहे. माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात याला आहे. या कार्यक्रमात 556 लाभार्थीना घरांच्या चाव्यांचे वाटप केले जाईल.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा चावी वाटपाचा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमानिमित्त व्यासपिठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित राहणार आहे. तसेच वरळी मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे हे देखील मंचावर उपस्थित राहणार आहे. बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाची घोषणा महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात झाली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या कार्यकाळात हे काम सुरू झाले होते. आता हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. ठाकरे आणि शिंदे एकाच व्यासपिठावर येणार असल्याने राजकीय चर्चाना उधाण आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.