Shrimp Farm Poisoned, 4 Tons Dead, Loss of ₹18 Lakhs : मालवणच्या आचरा-पारवाडी येथील कोळंबी प्रकल्पात अज्ञाताने विषारी पदार्थ टाकून विषप्रयोग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे ४ टन कोळंबी मरून पडली आहे. स्थानिक युवा शेतकरी अपूर्व फर्नाडीस यांचे तब्बल १८ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे.
फर्नाडीस यांनी याप्रकरणी मालवण आचरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पालकमंत्री नितेश राणे यांनी याची गंभीर दखल घेत तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. मालवणच्या आचरा-पारवाडी येथे कोळंबी प्रकल्पावर अज्ञात व्यक्तीकडून विषप्रयोग करण्यात आला आहे. यामध्ये चार टन कोळंबी मृत झाली असून, १८ लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे. पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.