virat kohli rohit sharma saam tv
Sports

Team India News: विश्रांती नव्हे तर 'या' कारणामुळे विराट,रोहित टी-२० क्रिकेट खेळणं टाळताय

Rohit Sharma - Virat Kohli: काय आहे यामागचं कारण? स्वत: रोहितने याबाबत खुलासा केला आहे.

Ankush Dhavre

Team India: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२२ स्पर्धा झाल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना भारतीय संघासाठी खुप कमी टी-२० सामने खेळण्याची संधी मिळाली आहे.

मात्र यामागचं कारण काय याबाबत बीसीसीआयकडून कुठलंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. नुकताच कर्णधार रोहित शर्माने यामागचं नेमकं कारण काय याबाबत खुलासा केला आहे.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने मुंबईतील एका इंव्हेंटमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी बोलताना त्याने यामागचं कारण सांगितलं आहे. याबाबत बोलताना तो म्हणाला की, 'गेल्या वर्षी टी-२० वर्ल्डकप होता, त्यामुळे आम्ही वनडे क्रिकेट खेळणं टाळत होतो.

यावर्षी वनडे वर्ल्डकप आहे त्यामुळे आम्ही टी-२० क्रिकेट खेळणं टाळतोय. हे वर्ल्डकप स्पर्धेचं वर्ष आहे ,त्यामुळे आम्हाला फ्रेश राहायचं आहे. आधीच संघातील खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. आता दुखापतीची भिती वाटते.'

दुखापतीने वाढवली टीम इंडीयाची चिंता..

वर्ल्डकप स्पर्धा सुरू व्हायला अवघे ५० दिवस शिल्लक राहीले आहेत. मात्र अजुनही संघातील प्रमुख खेळाडू पुर्णपणे फिट झालेले नाहीत.

गेले काही महिन्यांपासून संघाबाहेर असलेला जसप्रीत बुमराह भारतीय संघात कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. तर श्रेयस अय्यर आणि केएल राहुल अजुनही कमबॅक करण्याच्या वाटेवर आहेत. (Latest sports updates)

भारतात रंगणार वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा थरार..

यावर्षी भारतात वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. येत्या ५ ऑक्टोबरपासून या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. तर स्पर्धेतील अंतिम सामना १९ नोव्हेंबर रंगणार आहे.

भारतीय संघाचा पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. तर भारत -पाकिस्तान सामना १५ ऑक्टोबर रोजी रंगणार होता. मात्र सुधारीत वेळापत्रकानुसार हा सामना १४ ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुसळधार पावसामुळे मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर

Janhvi Kapoor: हंडी फोडताना 'भारत माता की जय' म्हणल्यामुळे जान्हवी कपूर ट्रोल; अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत सुनावले खडेबोल

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस; अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती, पुरात जीप वाहून गेल्याने ६ जण अडकले

High Blood Pressure : हाय ब्लड प्रेशर तर होणारच नाही शिवाय किडनीही निरोगी राहील, फक्त तुमच्या आहारात या गोष्टींचा समावेश करा

FASTag Annual Pass: मुंबई पुणे एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूवर फास्टॅग पास नाहीच!

SCROLL FOR NEXT