virat kohli twitter
Sports

Team India Victory Parade: 'मां तुझे सलाम...' वानखेडेवर 33 हजार फॅन्ससह विराट अन् टीम इंडियाने गायलं वंदे मातरम - VIDEO

Vande Mataram At Mumbai Wankhede Stadium: मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाच्या विजयाचा जल्लोष पार पडला. दरम्यान या विजयानंतर क्रिकेट फॅन्सने वंदे मातरम गायलं आहे.

Ankush Dhavre

भारतीय खेळाडूंनी आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत दमदार कामगिरी केली आणि दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपवर नाव कोरलं. भारतीय संघाने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव केला. यासह रोहित अँड कंपनीने भारतीय संघाचा आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा दुष्काळ संपवला.

हा विजय भारतीय क्रिकेटसाठी अतिशय महत्वाचा होता. त्यामुळे विजयाचा जल्लोषही तितकाच जोरदार करण्यात आला. दरम्यान या विजयानंतर भारतीय खेळाडूंनी वानखेडे स्टेडियमवर क्रिकेट फॅन्सचे आभार मानले.

भारतीय खेळाडूंनी गायलं वंदे मातरम

भारतीय खेळाडू मायदेशी परतल्यानंतर आधी दिल्लीला जाणार आणि त्यानंतर मुंबईत येणार हे आधीपासूनच ठरलं होतं. नियोजित वेळापत्रकानुसार, भारतीय संघ ३ जुलै रोजी भारतात दाखल झाला. मायदेशी परतल्यानंतर भारतीय खेळाडू दिल्लीतील ICT Maurya हॉटेलमध्ये गेले. काही वेळ विश्रांती केल्यानंतर भारतीय खेळाडू चॅम्पियन्सची जर्सी परिधान करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी दाखल झाले. दरम्यान मोदींची भेट घेतल्यानंतर भारतीय खेळाडू मुंबईत येण्यासाठी रवाना झाले.

खेळाडूंनी गायलं वंदे मातरम

भारतीय खेळाडू मुंबईत दाखल झाल्यानंतर, मुंबईतील नरीमन पॉईंट ते मरीन ड्राईव्हपर्यंत ओपन बस परेड काढण्यात आली. त्यानंतर खेळाडू वानखेडे स्टेडियममध्ये दाखल झाले. इथे खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.यासह बीसीसीआयने जाहीर केलेलं १२५ कोटींचं बक्षीस देण्यात आलं. दरम्यान खेळाडूंनी स्टेडियममध्ये आलेल्या फॅन्सला अभिवादन केलं. त्यावेळी ३४ हजाराहूंन अधिक लोकांनी एकत्र वंदे मातरम गायलं. त्यावेळी हार्दिक पंड्या, रोहित शर्मा आणि विराट कोहलीने एकसुरात वंदे मातरम गायलं. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. तसेच नेटकरी या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे.

भारतीय संघाचा शानदार विजय

भारतीय संघाने आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत दमदार कामगिरी केली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने या स्पर्धेतील एकही सामना गमावला नाही. स्पर्धेतील सेमिफायनलमध्ये भारतीय संघाने इंग्लंडचा एकतर्फी पराभव केला. त्यानंतर फायनलमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने ७ धावांनी विजय मिळवत, दुसऱ्यांदा वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Maharashtra Live News Update: भिवंडीतील नारपोली येथे बालाजी डाईंगला भीषण आग

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

IPS Anjana Krishna: आई टायपिस्ट, वडील कपडे विकायचे, एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेल्या, तरी जिद्दीने झाल्या IPS, वाचा अंजना कृष्णा यांचा प्रेरणादायी प्रवास

Saturday Horoscope: आनंदाचा दिवस; अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ राशींना होणार धनलाभ, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT