Rohit Sharma Saam TV
Sports

T20 World Cup IND vs ENG: इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात नेमकं काय चुकलं? पराभवाची कारणं समजून घ्या

इंग्लंड संघाने 16 षटकात एकही बाद 170 धावा केल्या. इंग्लंडकडून अॅलेक्स हेल्सने 47 चेंडूत नाबाद 86 धावा केल्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

T20 World Cup : टीम इंडियाचा पराभव करत इंग्लंडने फायनलमध्ये धडक मारली आहे. इंग्लंडने 169 धावांचे लक्ष्य एकही विकेट न गमावता पूर्ण केले. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 6 बाद 168 धावा केल्या. इंग्लंड संघाने 16 षटकात एकही बाद 170 धावा केल्या. इंग्लंडकडून अॅलेक्स हेल्सने 47 चेंडूत नाबाद 86 धावा केल्या.

कर्णधार जोस बटलरने 49 चेंडूत 80 धावा केल्या. भारताच्या सहापैकी चार गोलंदाजांनी 10 पेक्षा जास्त इकॉनॉमी रेटने धावा दिल्या. भारताचा पराभवाचं कोट्यवधी भारतीयांना दु:ख आहे. मात्र आजच्या पराभवाची नेमकी कारणं हे देखील तपासणं गरजेचं आहे.  (Cricket News)

संथगतीने धावा

टीम इंडियाची ओपनिंग जोडी सुपर-12 मध्ये अपयशी ठरली होती आणि उपांत्य फेरीतही तीच अवस्था दिसून आली. अवघ्या 9 धावा असताना केएल राहुल बाद झाला. त्यानंतर टीम इंडियाने संथ गतीने फलंदाजी केली. याचा फटका असा बसला की पॉवरप्लेमध्ये भारताला केवळ 38 धावा करता आल्या. तसेच हार्दिक पांड्याने शेवटी तुफान फडकेबाजी केली नसती तरी धावसंख्या आणखी कमी दिसली असती.

रोहित-सूर्या फेल

कर्णधार रोहित शर्माची बॅट संपूर्ण T20 विश्वचषकात शांत राहिली आणि उपांत्य फेरीतही तेच दिसले. रोहितने 28 चेंडूत 27 धावा केल्या, त्याचा स्ट्राईक रेट 100 पेक्षा कमी होता. दुसरीकडे सूर्यकुमार यादवने 10 चेंडूत 14 धावा केल्या. दोघांकडूनही चांगळ्या खेळीची अपेक्षा होती.

गोलंदाजांची सुमार कामगिरी

सुपर-12 मध्ये शानदार गोलंदाजी करणाऱ्या अर्शदीप सिंग आणि भुवनेश्वर कुमार यांनी उपांत्य फेरीत निराशा केली. पॉवरप्लेमध्ये दोघांना एकही विकेट घेता आली नाही तसेच धावाही रोखता आल्या नाहीत. भुवनेश्वर कुमारचा इकॉनॉमी रेट 10 पेक्षा जास्त होता. शमी, अश्विन आणि पांड्या यांनीही प्रत्येक षटकात 10 पेक्षा जास्त धावा दिल्या.

प्लेअर्सची निवड चुकली

टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनची निवड हेही कुठेतरी पराभवाचे कारण होते. भारताने विकेट घेणाऱ्या फिरकीपटूला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले नाही. अक्षर पटेलला संधी देण्यात आली, जो फक्त धावा रोखण्याचे काम करतो, युझवेंद्रला संपूर्ण स्पर्धेत संधी देण्यात आली नाही, याचा देखील टीम इंडियाला फटका बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT