Virat Kohli & Sourav Ganguly
Virat Kohli & Sourav Ganguly Saam TV
क्रीडा | IPL

विराट कोहलीच्या राजीनाम्यानंतर सौरव गांगुली म्हणाले हा निर्णय...

वृत्तसंस्था

विराट कोहलीने अचानक कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर क्रिकेट जगतातील सर्वांनाच धक्का बसला आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) म्हणाले की, टीम इंडियाच्या (Team India) कसोटी कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा विराट कोहलीचा निर्णय हा ‘वैयक्तिक’ निर्णय आहे. कोहलीच्या राजीनाम्याने इतरांप्रमाणे गांगुलीलाही धक्का बसला आहे. पण त्याचवेळी बीसीसीआय कोहलीच्या (Virat Kohli) निर्णयाचा आदर करत असल्याचेही गांगुलींनी सांगितले. (Sourav Ganguly Reaction On Virat Kohli)

सात वर्षे (2014-2022) संघाचे नेतृत्व केल्यानंतर विराट कोहलीने भारताच्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. याआधी कोहलीने वनडे आणि टी-20 च्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली होती. बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी ट्विट केले की बोर्ड कोहलीच्या निर्णयाचा आदर करते. गांगुलींनी ट्विट केले की, "विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघातील खेळाडूंनी सर्व फॉरमॅटमध्ये झपाट्याने प्रगती केली आहे. त्याचा निर्णय वैयक्तिक आहे आणि बीसीसीआय त्याचा खूप आदर करते. तो संघातील महत्त्वाचा सदस्य आहे त्यामुळे आगामी काळात तो संघाला नवीन उंचीवर नेईल."

गेल्या वर्षीच कोहलीने टी-20 कर्णधारपद सोडले आणि त्यानंतर त्याला एकदिवसीय कर्णधारपदावरून हटवण्यात आले. कारण संघ निवडकर्त्यांना वनडे आणि टी-२० फॉरमॅटसाठी एकच कर्णधार हवा होता. गेल्या वर्षी 16 सप्टेंबर रोजी कोहलीने टी-20 फॉर्मेटमधून कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर 8 डिसेंबर रोजी निवड समितीने त्याला एकदिवसीय कर्णधारपदावरूनही हटवले. कारण निवड समितीला वनडे आणि टी-20 साठी एकच कर्णधार हवा होता. कोहलीला एकदिवसीय कर्णधारपदावरून हटवल्यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले की, त्यानी कोहलीला वनडे कर्णधारपद सोडू नये अशी विनंती केली होती. मात्र कोहलीने याचा साफ इन्कार केला.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Narendra Modi : यांच्या ४ पिढ्यांनी दिल्लीवर राज्य केलं, पण..., PM नरेंद्र मोदींचा इंडिया आघाडी आणि काँग्रेसवर हल्लाबोल

Today's Marathi News Live: पुण्यातील हिंगणे मळ्यात हाय टेन्शनची विद्युतवाहिनी तुटली

Prakash Ambedkar: शरद पवार, उद्धव ठाकरे निवडणुकीनंतर भाजपसोबत जातील, प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Video: 48 पैकी 49 जागाही Uddhav Thackeray जिंकून आणू शकतात! देवेंद्र फडणवीसांच्या विधान ऐकून एकच हास्यकल्लोळ

Akola Accident: देव तारी त्याला कोण मारी! ट्रक आणि कारचा भीषण अपघात; कारमधील सर्वजण सुखरुप

SCROLL FOR NEXT