Gautam gambhir saam tv
Sports

India vs Pakistan: 'पाकिस्तानचा संघही मजबूत..',भारत-पाकिस्तान सामन्याआधी गौतम गंभीरचं मोठं विधान,म्हणाला...

Gautam Gambhir Statement: या सामन्यापूर्वी गौतम गंभीरने मोठं वक्तक्य केलं आहे.

Ankush Dhavre

Gautam Gambhir Statement:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सर्वात बहुप्रतिक्षित सामना सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमने सामने येणार आहे.

दरम्यान या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने भारत-पाकिस्तान सामन्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी बोलताना गौतम गंभीर म्हणाला की,'पाकिस्तानचा संघही मजबूत संघ आहे. पाकिस्तानकडेही मॅचविनर खेळाडू आहेत. भारतीय संघाला सतर्क राहावं लागणार आहे. त्यांनी १०० षटके दर्जेदार खेळ केला, तरच ते हा सामना जिंकू शकतील.'

बाबर आझमचंही केलं होतं कौतुक..

यापूर्वी गौतम गंभीरने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचं कौतुक केल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यावेळी तो म्हणाला होता की,' 'ज्या शैलीने बाबर आझम फलंदाजी करतो ते पाहता, माझ्या मते तो वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तान संघासाठी ३ ते ४ शतके झळकावू शकतो.'मात्र बाबर आझमला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये तो स्वस्तात बाद होऊन माघारी परतला आहे. (Latest sports updates)

असा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड..

भारत पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा आमने सामने येतात तेव्हा क्रिकेट चाहत्यांना रोमांचक सामना पाहायला मिळत असतो. हे दोन्ही संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बलाढ्य संघ आहेत.

दोन्ही संघांचा वर्ल्डकप स्पर्धेतील रेकॉर्ड पाहिला तर हे दोन्ही संघ वर्ल्डकप स्पर्धेत ७ वेळेस आमने सामने आले आहेत. या सातही सामन्यांमध्ये भारतीय संघाने बाजी मारली आहे. त्यामुळे भारतीय संघ सलग आठवा विजय मिळवण्यासाठी मैदानावर उतरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan 2025 : श्रावण महिना कोणत्या तारखेपासून सुरु होतोय?

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या उगले दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान, CM फडणवीसांनी दिलं मोठं गिफ्ट

‘गब्बर के ताप से आपको सिर्फ गब्बरही बचा सकता है’; शिवसेनेच्या बड्या नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र

Rohtang Accident : भरधाव कार दरीत कोसळली; ४ जणांचा जागीच मृत्यू, वाहनाचा अक्षरश: चक्काचूर

Maharashtra Live News Update: प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगडावर भक्तांनी घेतले विठुरायाचे दर्शन

SCROLL FOR NEXT