IPL 2025 मध्ये मुंबई इंडियन्सची खराब सुरुवात झाली आहे. मुंबईने एकूण पाच सामने खेळले आहेत. त्यातील एकाच सामन्यात मुंबईचा विजय मिळवला आहे. उरलेल्या चार सामन्यांमध्ये मुंबईला पराभवाचा सामना करावा लागणार आहे. मुंबई १३ एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्ससमोर लढत देणार आहे. या सामन्यासाठी मुंबईचा संघ दिल्लीला पोहोचला आहे. पण त्याआधीच मुंबई इंडियन्सवर अनपेक्षित संकट आले आहे.
मुंबई इंडियन्सचे खेळाडू दिल्लीच्या स्टेडियमवर सराव करण्यासाठी गेले होते. सराव सत्र सुरु असताना अचानक वादळ आले. अनपेक्षित वेळी पाऊस पडायला सुरुवात झाल्याने मुंबईच्या खेळाडूंची एकच पळापळ झाली. त्यानंतर मुंबई इंडियन्सचे सराव सत्र थांबवण्यात आले. मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर या घटनेचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा हसत-हसत खेळाडूंना माघारी बोलावत असल्याचेही पाहायला मिळत आहे.
मुंबई इंडियन्सची कामगिरी यंदाच्या आयपीएल सीझनमध्ये निराशाजनक ठरत आहे. मागील सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने तब्बल १० वर्षांनंतर मुंबई विरुद्ध वानखेडे स्टेडियमवर खेळताना विजय मिळवला. रोहित शर्माचा फॉर्म सध्या काळजीचा विषय ठरत आहे. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्यामुळे मुंबईची फलंदाजी टिकून आहे. हार्दिक पंड्या आणि नमन धीर शेवटच्या ओव्हर्समध्ये चांगला खेळ करत आहेत.
जसप्रीत बुमराह परतल्याने संघाला गोलंदाजी विभागात ताकद मिळाली आहे. हार्दिक पंड्या फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. कर्णधार म्हणून हार्दिक पंड्या योग्य पद्धतीने जबाबदारी पार पाडत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईला प्लेऑफच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी दिल्ली विरुद्धचा सामना जिंकणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.