oldest cricket match yandex
Sports

Longet Cricket Match: क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा सामना! 1891 रन्स करुनही नव्हता लागला निकाल

Timeless Cricket Match: क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा क्रिकेट सामना किती दिवस सुरु राहिला?माहितेय का?

Ankush Dhavre

टी -२० क्रिकेटच्या या युगात ५ दिवसांचा सामना पाहण्याची मजा कुठेतरी कमी होत चालली आहे. लोकांना क्रिकेट नाही, तर एंटरटेनमेंट हवं आहे. त्यामुळे ३ तासांचा टी-२० सामना पाहण्यासाठी स्टेडियम गच्च भरलेलं असतं. तर ५ दिवसांचा कसोटी सामना पाहण्यासाठी क्वचितच गर्दी पाहायला मिळते. पाकिस्तानात, तर फुकटाच एन्ट्री देऊनही प्रेक्षक कसोटी सामना पाहण्यासाठी यायला तयार नाहीत.

तसा कसोटी क्रिकेटचा एक सामना ४ सेशन आणि ५ दिवस सुरु राहतो. मात्र कसोटीतही आता आक्रमक क्रिकेट पाहायला मिळत आहे. त्यामुळे ५ दिवस चालणारे सामने आता २-३ दिवसात समाप्त होत आहेत. मात्र तुम्हाला माहितेय का? आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मोठा सामना किती दिवस सुरु होता?जाणून घ्या.

माध्यमातील वृत्तानुसार, १९३९ मध्ये क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा सामना सुरु झाला होता. हा सामना ३ मार्चला सुरु झाला होता, तर १४ मार्च रोजी समाप्त झाला होता. ९ दिवस सुरु राहिलेल्या या सामन्याला टाईमलेस सामना देखील म्हटलं जातं. हे कसं शक्य आहे? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच ना? जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं.

या सामन्याचा निकाल ९ दिवसांनी लागला होता. ज्यात ५ आणि १२ मार्च रोजी रेस्ट डे देण्यात आला होता. तर ११ मार्च रोजी जोरदार पाऊस पडल्याने खेळ पूर्ण होऊ शकला नव्हता. हा सामना ४३ तास १६ मिनिटं सुरु राहिला होता. या सामन्याची क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा सामना म्हणून नोंद करण्यात आली.

या सामन्यात अनेक मोठ मोठे रेकॉर्ड मोडले गेले होते. ज्यात सर्वाधिक धावा बनवण्याच्या रेकॉर्डचा देखील समावेश होता. दोन्ही संघांनी मिळून १८९१ धावा केल्या होत्या. यादरम्यान ६ शतकं झळकावली गेली.

या सामन्यातील दुसऱ्या डावात इंग्लंडने ६५४ धावा केल्या होत्या. इंग्लंडला जिंकण्यासाठी आणखी ४२ धावा करायच्या होत्या. मात्र इंग्लंडला पुढील खेळ सुरु ठेवता आला नाही. कारण इंग्लंडला २ दिवस ट्रेनने प्रवास आणि त्यानंतर जहाजातून केपटाऊनला रवाना व्हायलं होतं. त्यामुळे हा सामना ड्रॉ वर समाप्त करण्यात आला होता.

इतका मोठा कसोटी सामना खेळण्याची अनुमती कशी मिळाली?

आता तुम्हालाही प्रश्न पडलाच असेल, की एखादा सामना इतके दिवस कसा काय सुरु राहु शकतो. दर दोन्ही कर्णधारांनी मिळून हा निर्णय घेतला होता. जर कसोटी मालिका बरोबरीत असेल किंवा एखादा संघ १ ने आघाडीवर असेल, तर शेवटचा कसोटी सामना टाइमलेस असेल, हे आधीच ठरलं होतं. त्यामुळे सामन्याचा निकाल लागेपर्यंत हा सामना काही संपलाच नव्हता. या सामन्याची क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा सामना म्हणून आजही नोंद आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोणत्याही प्रकारची गुंडागर्दीत नको पारदर्शक कारभार करणारी नगरपालिका हवी - देवेंद्र फडणवीस

Syed Mushtaq Ali Trophy: ऐन सामन्यात यशस्वी जैस्वालची तब्येत अचानक बिघडली, पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात दाखल

डोंबिवली स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा अतिक्रमणाचा विळखा; रेल्वे प्रवाशांची वाट काढताना दमछाक

Thursday Horoscope : अचानक धनलाभ होईल, कुटुंबातील सदस्य खूश होतील; ५ राशींच्या लोकांच्या मनासारख्या घटना घडतील

IND vs SA 4th T20I: भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात धुक्याचा खोडा; चौथा टी२० सामना रद्द

SCROLL FOR NEXT