आयपीएल २०२४ स्पर्धेतील ४४ व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा या संघाचा या हंगामातील चौथा पराभव ठरला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनऊ सुपर जायंट्स संघाने २० षटकअखेर ५ गडी बाद १९६ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघाने १९ षटकात आव्हान पूर्ण केलं. दरम्यान या पराभवानंतर काय म्हणाला केएल राहुल? जाणून घ्या.
या पराभवानंतर बोलताना कर्णधार केएल राहुल म्हणाला की, ' आम्ही २० धावा कमी केल्या. आम्हाला चांगली सुरुवात मिळाली नव्हती. मात्र माझ्यात आणि दीपक हुड्डामध्ये चांगली भागीदारी झाली. अशा सामन्यांमध्ये फलंदाजांना सेट झाल्यानंतर ६०-७० धावांचं रूपांतर १०० धावांमध्ये करावं लागेल. मला वाटतं की, आम्ही १५ व्या षटकापर्यंत १५० धावा केल्या होत्या. याचा आम्हाला आणखी फायदा घ्यायला हवा होता. '
तसेच तो पुढे म्हणाला की, ' हे तर स्पष्ट झालं आहे की, जो संघ सर्वाधिक षटकार मरतो, तो संघ सामना जिंकतो. सुरुवातीला २ फलंदाज बाद झाल्यानंतर आम्हाला आमची फलंदाजी स्टाईल बदलावी लागली. जर हुड्डाने २० आणि मी २० धावा आणखी केल्या असत्या तर आम्ही २२० धावांपर्यंत मजल मारू शकलो असतो. याच २० धावांमुळे आम्ही मागे राहिलो. सर्वांना हिटींग आवडते, आम्हालाही हिटींग आवडते आणि आम्हीही तेच करतोय. आमच्या संघात बिग हीटर्स म्हणून मार्कस स्टोइनिस आणि निकोलस पुरनसारखे फलंदाज आहेत.'
अमित मिश्राबाबत बोलताना तो म्हणाला की, ' सामन्यापूर्वी आमच्यात चर्चा झाली होती. तो संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज आहे. तो धीम्या गतीने गोलंदाजी करतो. बाऊंड्री मोठी असल्याने तो फायदेशीर ठरू शकतो. क्रूणालनेही चांगली गोलंदाजी केली. त्यांनी वेगवान गोलंदाजांवर हल्ला केला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.