IPL 2022 | GT vs RR Saam TV
Sports

IPL 2022 Playoff: पावसाने सामना रद्द झाला तर?, अंतीम सामन्याबद्दल मोठा निर्णय

आज गुजरात आणि राजस्थान यांच्या प्लेऑफचा पहिला सामना आहे.

Pravin

आयपीएल 2022 चा (IPL 2022) चॅम्पियन कोण? हे लवकरच समजणार आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये प्रत्येक वेळी प्रमाणे या हंगामातही चार संघांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. ज्यामध्ये गुजरात टायटन्स (Gujrat Titans), राजस्थान रॉयल्स, लखनौ सुपर जायंट्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा समावेश आहे. सध्या भारतावर पावसाचे संकट आहे. त्यामुळे प्लेऑफचे सामने लक्षात घेऊन नवे नियम जारी करण्यात आले आहेत. हे नियम क्वालिफायर 1, एलिमिनेटर, क्वालिफायर 2 ला देखील लागू करण्यात आले आहेत. या सामन्यांसाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. (IPL 2022 Playoff)

मात्र स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी 30 मे राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. हा सामना रात्री 8 वाजता सुरू होईल. आज आयपीएलची पहिली क्वालिफायर्स आजपासून कोलकातामध्ये सुरू होणार आहेत आणि हवामान खात्याने येथे ढगाळ हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. नवीन नियमांनुसार, पावसामुळे आजचा सामना रद्द झाला, तर साहजिकच गुजरात टायटन्सला विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश मिळणार आहे.

आज गुजरात आणि राजस्थान यांच्या प्लेऑफचा पहिला सामना आहे. जिंकणार संघ थेट अंतीम सामन्यात प्रवेश करतो तर हारलेल्या संघाला आणखी एक संघी असते. दुसरा प्लेऑफचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये होणार आहे. यांच्यातील विजयी संघ पहिल्या सामन्यातील हारलेल्या संघासोबत खेळणार आहे. लखनौ आणि गुजरात हे दोन संघ यंदाच्या हंगामात नव्याने दाखल झालेले आहेत. आणि या दोन्ही संघांकडे विजयाचे प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जाते.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची 1100 कोटी रूपयांची ऊस बिले थकली

Success Story: फ्रान्समधून शिक्षण, ३० लाखांच्या पगाराची नोकरी सोडली; दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IPS कृष्ण कुमार बिश्नोई यांचा प्रवास

Jeera Ajwain Water Benefits: रोज सकाळी उठल्यावर जीरा ओवा पाणी प्यायल्याने होतील हे आरोग्यदायी फायदे

kolhapur shocking : मस्साजोग प्रकरणाची पुनरावृत्ती? पाटेगावचा माजी सरपंच तब्बल २ महिन्यांपासून बेपत्ता

Reliance Jioचे नवे सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान; वाचा संपूर्ण लिस्ट

SCROLL FOR NEXT