england cricket team  saam tv news
Sports

IND vs ENG Test Series: भारत- इंग्लंड मालिका रद्द होणार? इंग्लंडचा संघ परदेशात जाणार! वाचा कारण

England Team Will Return To Abu Dhabi: भारत - इंग्लंड कसोटी मालिका पूर्ण होणार नाही? भारत - इंग्लंड कसोटी मालिका अर्ध्यातच संपणार? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Ankush Dhavre

India vs England Test Series:

भारत - इंग्लंड कसोटी मालिका पूर्ण होणार नाही? भारत - इंग्लंड कसोटी मालिका अर्ध्यातच संपणार? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यामागचं कारण असं की, भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना झाल्यानंतर इंग्लंडने परदेशात जाण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डने हा निर्णय का घेतला? काय आहे हा निर्णय घेण्यामागचं नेमकं कारण? जाणून घ्या.

तर टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील कसोटी मालिका रद्द होणार नाहीये. ना या मालिकेतील वेळापत्रकात कुठला बदल होणार आहे. मात्र विशाखापट्टनममध्ये झालेल्या पराभवानंतर इंग्लंडचा संघ परदेशात जाणार हे नक्की आहे.

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. मालिकेतील २ सामने झाले असून पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने दमदार कमबॅक करत विजय मिळवला आहे. सध्या ही मालिका १-१ च्या बरोबरीत आहे. (Cricket news in marathi)

मालिकेतील तिसरा सामना १५ फेब्रुवारीपासून राजकोटच्या मैदानावर रंगणार आहे. माध्यमातील वृत्तानुसार, इंग्लंडचा संघ तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी विश्रांती म्हणून अबूधाबीला जाणार आहे. इथे इंग्लंडचे खेळाडू गोल्फ देखील खेळणार आहेत. माध्यमातील वृत्तात असं म्हटलं गेलं आहे की, इंग्लंडचे काही खेळाडू आजारी आहेत. त्यामुळे रिफ्रेश होण्यासाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डने हा निर्णय घेतला आहे.

राजकोट कसोटी सुरू व्हायला आणखी १० दिवस शिल्लक आहेत. या १० दिवसात रिफ्रेश होण्यासाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. भारतात येण्यापूर्वी इंग्लंडने अबूधाबीमध्ये कसून सराव केला होता. इथेच त्यांनी भारतीय संघाला हरवण्याचा प्लान केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! हे आयडी लगेचच तयार करा, अन्यथा पीएम किसान योजनेचा हप्ता विसरा

Chhattisgarh : ३६ किल्ल्यांची भूमी छत्तीसगड! भारतात लपलेला ऐतिहासिक खजिना, तुम्ही कोण-कोणते किल्ले पाहिलात?

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये रिंगरोड बाधित शेतकऱ्यांचे भाजप कार्यालयावर आंदोलन

Good News : LPG दरात झाली मोठी घट, ऑटो चालकांना मोठा दिलासा, पाहा आता किती रूपयांना मिळणार?

पांढरे केस होतील काळे! तुरटी आणि आवळ्याचा 'हा' सोपा उपाय ठरेल फायदेशीर

SCROLL FOR NEXT