IND vs CAN Google
क्रीडा

IND vs CAN, Weather Update: भारत- कॅनडा सामना रद्द होणार? समोर आलं चिंता वाढवणारं कारण

Ankush Dhavre

भारतीय संघाने आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत आतापर्यंत ३ सामने खेळले आहेत. हे तिन्ही सामने जिंकून भारतीय संघाने सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. तर साखळी फेरीतील शेवटचा सामना कॅनडाविरुद्ध होणार आहे. हा सामना फ्लोरिडामध्ये रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ फ्लोरिडात दाखल झाला आहे. मात्र जोरदार पाऊस असल्याने भारतीय संघाला सराव सत्र रद्द करावं लागलं आहे.

भारतीय संघाचं सराव सत्र रद्द

भारत आणि कॅनडा या दोन्ही संघांमध्ये होणारा सामना १५ जून रोजी होणार आहे. या सामन्याच्या १ दिवसापूर्वी भारतीय संघाचं सराव सत्र होणार होतं. मात्र पावसामुळे हे सराव सत्र रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून फ्लोरिडामध्ये वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अमेरिका आणि आयर्लंडसह भारत आणि कॅनडा यांच्यात होणारा सामना देखील रद्द केला जाऊ शकतो.

भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. साखळी फेरीतील सामने झाल्यानंतर सुपर ८ च्या सामन्यांसाठी भारतीय संघ वेस्टइंडिजला रवाना होणार आहे. सुपर ८ मध्ये भारतीय संघाचे सामने २०, २२ आणि २४ जून रोजी होणार आहेत.

भारत- कॅनडा सामना रद्द होणार?

श्रीलंका आणि नेपाळ यांच्यात होणारा सामना एकही चेंडू न टाकता रद्द केला गेला होता. सोशल मीडियावर लॉडरहीलमध्ये होत असलेल्या पावसाचे अनेक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहेत. ज्यात वाहणं वाहून जात असल्याचं दिसून येत आहे. पावसामुळे हा सामना रद्द झाला, तर भारतीय संघाला फार फरक पडणार नाही. मात्र अमेरिका आणि आयर्लंड यांच्यातील सामना रद्द झाला, तर पाकिस्तानचा संघ शेवटचा सामना जिंकूनही सुपर ८ मध्ये प्रवेश करु शकणार नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi : पंतप्रधान मोदींची विरोधकांवर कठोर शब्दांत टीका; पाहा Video

Marathi News Live Updates : सांगलीमध्ये ४० ते ५० जणांना भगरीच्या तांदळातून विषबाधा

Rekha: मी प्रेमाला नाही तर 'बिग बी'ला घाबरते, अभिनेत्री रेखाचा मोठा खुलासा; पाहा VIDEO

Irani Cup 2024: मुंबई'अजिंक्य'! २७ वर्षांची प्रतिक्षा संपवत कोरलं इराणी ट्रॉफीवर नाव

Rahul Gandhi : संविधानात शिवरायांची विचारधारा! राहुल गांधींनी कोल्हापुरातून महाराष्ट्राला केलं मोठं आवाहन

SCROLL FOR NEXT