India vs Australia 2nd Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने दमदार खेळ करत २९५ धावांनी विजय नोंदवला होता.
मालिकेतील दुसरा सामना अॅडिलेडच्या मैदानावर रंगणार आहे. हा सामना भारतीय संघासाठी मुळीच सोपा नसणार आहे. कारण हा डे-नाईट कसोटी सामना असणार आहे. डे- नाईट कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवणं हे मुळीच सोपं नाही. कारण, ऑस्ट्रेलियाने एकही कसोटी सामना गमावलेला नाही. या सामन्यापूर्वीच भारतीय संघासाठी टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे.
या मालिकेतील दुसरा कसोटी सामना येत्या ६ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाला सराव सामना खेळण्याची संधी मिळाली. प्राईम मिनिस्टर ११ आणि भारतीय संघात २ दिवसीय डे- नाईट सराव सामना रंगणार आहे.
मात्र या सामन्यातील पहिल्याच दिवशी पावसाने खोडा घातला. पावसामुळे पहिला दिवस रद्द करण्यात आला आहे. पहिल्या दिवशी टॉसही झालेला नाही. शुभमन गिल दुखापतीमुळे पहिला कसोटी सामना खेळू शकला नव्हता.
मात्र तो दुसऱ्या कसोटीपूर्वी फिट झाला आहे. हा सराव सामना त्याच्यासाठी उत्तम संधी असणार आहे. आता दुसऱ्या दिवशी खेळ होणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हा सराव सामना केवळ २ दिवस खेळला जाणार आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवसासाठी दोन्ही संघांनी मोठा निर्णय घेतला आहे. हा सराव सामना ५०-५० षटकांचा खेळवला जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळे भारतीय फलंदाजांना ५० षटकं फलंदाजी करण्याची संधी मिळेल आणि भारतीय गोलंदाजांना ५० षटकं गोलंदाजी करण्याची संधी मिळेल. त्यामुळे भारतीय खेळाडूंना पिंक बॉलने सराव करण्याची संधी मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.