Ind vs Pak T20 Asia Cup Saam Tv
Sports

Ind vs Pak T20 Asia Cup : पाकिस्तानचा संघ भारताविरुद्ध 'काळी पट्टी' लावून का खेळतोय, जाणून घ्या काय आहे कारण

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये सामना होत आहे.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: आशिया चषक 2022 हंगामातील दुसरा सामना आज 28 ऑगस्ट रोजी होत आहे. हा सामना भारत (Team India) आणि पाकिस्तानमध्ये सुरू आहे. हा सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू झाला आहे.

या सामन्यात पाकिस्तान क्रिकेट संघ 'काळी पट्टी' परिधान करून मैदानात उतरला आहे. पाकिस्तानमध्ये आलेल्या पुरामुळे 1 हजारपेक्षा जास्त नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. त्यांच्यासाठी टीमने काळी पट्टी लावून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या संदर्भात अधिकृत निवेदन जारी केले आहे. 'पाकिस्तान क्रिकेट संघ आज आशिया कपमध्ये पहिला सामना भारतीय संघाविरुद्ध (Team India) खेळणार आहे. या सामन्यात पाकिस्तानचा संघ काळी पट्टी बांधून खेळणार आहे. पाकिस्तानातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी हे केले जाणार आहे, अस या निवेदनात म्हटले आहे.

पूरग्रस्तांसाठी प्रार्थना

सामन्याच्या एक दिवस आधी कर्णधार बाबर आझमने पत्रकार परिषदेत पाकिस्तानातील पुराबद्दलही भाष्य केले. पूरग्रस्तांना मदत करण्याचे आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहनही त्याने केले. आपल्या देशासाठी हा कठीण काळ असल्याचे बाबर म्हणाला होता.

पुरात एक हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा, बलुचिस्तान आणि सिंध प्रांतातील बहुतांश भागात भीषण पूरस्थिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान मधील 30 लाखाहून अधिक लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत. यामध्ये एक हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तिन्ही प्रांतातील परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Car Price Drop: GST कमी झाल्यावर ७५,००० रुपयांनी स्वस्त झाली टाटाची कार, आता किंमत किती?

डेंग्यूच्या आजाराचा डास कसा ओळखाल?

वेताळवाडी किल्ल्यावर टोळक्यांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली, एक जण जखमी

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

SCROLL FOR NEXT