भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना आज तिरुअनंतपुरम होत आहे. येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इशान किशनच्या शतक आणि सूर्याच्या धमाकेदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने न्यूझीलंडसमोर २७२ धावांचे लक्ष्य ठेवलंय. भारतीय फलंदाजांनी शेवटच्या १० षटकांत १६९ धावा केल्या.
ही लढत देखील खास आहे, कारण ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वचषकापूर्वी तयारी आणि प्रयोग करण्याची ही दोन्ही संघांसाठी शेवटची संधी असणार आहे. यानंतर भारत आणि न्यूझीलंड थेट विश्वचषकात भीडतील. टीम इंडिया सध्या मालिकेत ३-१ च्या आघाडीवर आहे. पण दोन्ही संघ विश्वचषकापूर्वी त्यांचा शेवटचा सामना जिंकण्याचा प्रयत्न करतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.