भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सच्या मैदानावर पार पडला. हा सामना भारतीय संघाने ७ गडी राखून आपल्या नावावर केला. या शानदार विजयासह भारताने ५ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. यादरम्यान भारतीय संघाच्या नावे एका खास रेकॉर्डची नोंद झाली आहे.
इंग्लंडला धूळ चारताच भारतीय संघाने इतिहास रचला आहे. भारताने कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळताना सलग सातवा विजय मिळवला आहे. यासह आयसीसीघ्या फुल मेंबर संघांमध्ये एकाच मैदानावर खेळताना सलग सर्वाधिक सामने जिंकण्याच्या बाबतीत भारतीय संघ दुसऱ्या स्थानी आहे. या मोठ्या रेकॉर्डमध्ये भारताने पाकिस्तानची बरोबरी केली आहे. यापूर्वी २००८ ते २०२१ पर्यंत पाकिस्तानने कराचीच्या मैदानावर खेळताना सलग ७ सामने जिंकले होते.
इंग्लंडचा संघ या यादीत अव्वल स्थानी आहे. या संघाने २००७ पासून ते २०२१ पर्यंत कार्डिफमध्ये खेळताना सलग ८ सामने जिंकले. आता भारतीय संघाकडे हा रेकॉर्ड मोडण्याची संधी असणार आहे.
या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंडकडून एकटा जोस बटलर चमकला.
त्याने शानदार अर्धशतकी खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने इंग्लंडची धावसंख्या १३२ वर पोहोचवली. भारताकडून धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या अभिषेक शर्माने वादळी अर्धशतकी खेळी केली आणि भारताला ७ गडी राखून विजय मिळवून दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.