ind vs bangladesh saamtv
Sports

Ind Vs Bangladesh: उमेश- अश्विनच्या गोलंदाजीसमोर बांग्लादेशचे लोटांगण, 227 धावात आटोपला पहिला डाव; भारताची सावध सुरूवात

भारत आणि बांग्लादेश यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने दमदार सुरूवात केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ind Vs Bangladesh: भारत आणि बांग्लादेश यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने दमदार सुरूवात केली. ढाकाच्या शेर ए बांग्ला मैदानावर सुरू झालेल्या या सामन्याच्या पहिल्याच दिवशी उमेश यादव आणि आर अश्विनच्या गोलंदाजीची जादू पाहायला मिळाली.

उमेश यादव आणि रविचंद्रन अश्विनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या 227 धावांत आटोपला. बांगलादेशकडून संघात पुनरागमन करणाऱ्या माजी कर्णधार मोमिनुल हकने उत्कृष्ट खेळी केली, मात्र त्याला उर्वरित फलंदाजांची चांगली साथ मिळाली नाही.

पहिल्या दिवशीचा खेळ खराब प्रकाशामुळे 6 षटके आधी थांबवावा लागला. टीम इंडियासाठी कर्णधार केएल राहुल आणि शुभमन गिल या सलामीच्या जोडीने विकेट न गमावता 19 धावा केल्या. राहुलला मात्र अंपायरने एकदा आऊट दिले, पण डीआरएसने तो वाचवला.

या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याचाही निर्णय योग्य वाटत होता. कारण भारतीय संघाने (Indian Team) कुलदीपला न खेळवण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या कसोटीत कुलदीपच्या गोलंदाजीने बांग्लादेशी फलंदाज चांगलेच त्रस्त झाले होते. झाकीर हसन आणि नजमुल हसन शांतो यांनी 15 व्या षटकापर्यंत 39 धावांची भागीदारी करून चांगला पाया रचताना दिसले. त्यानंतर उनाडकटने उत्कृष्ट शॉर्ट बॉलवर झाकीरला झेलबाद करून आपली पहिली कसोटी विकेट घेतली.

मॉमिनुलचे जोरदार पुनरागमन

खराब फॉर्ममुळे कसोटी कर्णधारपद आणि संघातील स्थान गमावलेला मोमिनुल हक 6 महिन्यांनंतर पुनरागमन करत असून तो बांगलादेशचा (Bangladesh) सर्वात यशस्वी फलंदाज असल्याचे सिद्ध झाले. या अनुभवी डावखुऱ्या फलंदाजाने केवळ भारतीय गोलंदाजांचा जोरदार सामना केला नाही तर अनेक आक्रमक फटकेही लगावले.

मोमिनुलने (84) कारकिर्दीतील 16 वे अर्धशतक झळकावले. त्याला साथ देताना कर्णधार शकीब अल हसन (१६), मुशफिकुर रहीम (२६) आणि लिटन दास (२५) यांनी चांगली सुरुवात केली पण मोठ्या भागीदारीत त्याचे रुपांतर होऊ शकले नाही.

उमेश यादव- अश्विनच्या फिरकीची जादू

भारताकडून अश्विनला या डावात चांगले यश मिळाले. गेल्या कसोटीत विकेट्सच्या बाबतीत फारसे यशस्वी नसलेल्या अश्विनने यावेळी मोठ्या विकेट घेत बांगलादेशचा डाव हादरवला. त्यानेच मोमिनुल हकला त्याच्या शतकापासून रोखले आणि भारताला महत्त्वपूर्ण यश मिळवून दिले, ज्याने टेल एंडर्सना लवकर गुंडाळण्यात भूमिका बजावली.

सोबतच उमेश यादवनेही प्रभावी गोलंदाजीने सुरुवात केली आणि हळूहळू त्याचे चांगले परिणाम दिसून आले. उमेशने रिव्हर्स स्विंगचाही चांगला वापर केला. याचे उत्तम उदाहरण नुरुल हसन विरुद्ध दाखवले गेले, जेव्हा तो ऑफ स्टंपच्या ओळीत खेळण्याचा प्रयत्न करताना पूर्णपणे चुकला आणि पायचित झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: ICU मध्ये बेड नाही, स्ट्रेचरवरच उपचार; कूपर रुग्णालयात २ रुग्णांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: यवतमाळमध्ये उन्हाचा चटका वाढताच रस्त्यावर शुकशुकाट

BJP: माझ्यासोबत शरीरसंबंध ठेव, तेव्हाच पद मिळेल; महिला पदाधिकाऱ्याचा भाजप नेत्यावर गंभीर आरोप, राजकारणात खळबळ

होणाऱ्या नवऱ्यासोबत फिरायला गेली, वाटेत दोघांनी अडवलं; जंगलात नेऊन तरुणीवर सामूहिक अत्याचार

Auto Driver Marathi language : हिंदीसक्तीचा बदला घेण्यासाठी शिंदेसेनेची मराठीसक्ती? EXPLAINER

SCROLL FOR NEXT