ICC Test Ranking Saam TV
Sports

ICC Test Ranking: भारत नंबर 'दोन'वर, ऑस्ट्रेलियाला मागे टाकण्याची संधी

न्यूझीलंडने हा सामना गमावल्यामुळे क्रमावारीत भारताला फायदा झाला आहे.

वृत्तसंस्था

पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला (Team New Zealand) हारवले. त्यामुळे आईसीसी टेस्ट रँकिंगमध्ये न्यूझीलंड आता तिसऱ्या क्रमांकावर गेले आहे. कगिसो रबाडा (Kagiso Rabada) आणि मार्को जेनसनच्या (Marco Jenson) चमकदार कामगिरीमुळे शेवटच्या डावात आप्रिकेने दुसऱ्या कसोटी सामन्याच न्यूझीलंडला १९८ धावांनी हरवले. या विजयासोबत दक्षिण आफ्रिकेने दोन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबर साधली आहे.

न्यूझीलंडने हा सामना गमावल्यामुळे क्रमावारीत भारताला फायदा झाला आहे. ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर आहे, तर भारत (Team India) दुसऱ्या क्रमांकावर आहे. श्रीलंका मालिकेपुर्वी भारत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्यामुळे ही मालिका जर भारत जिंकला तर भारतला पहिल्या क्रमांकावर येण्याची संधी असणार आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाही पाकिस्तान सोबत कसोटी मालिका खेळणार आहे.

जागतिक क्रमवारीच्या (World Ranking) अधिकृत वेबसाइटनुसार भारताचे ११६ गुण आहेत तर न्यूझीलंडचे ११५ गुण आहेत. 6 मार्चपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतला श्रीलंकेशी खेळावं लागणार आहे. ऑस्ट्रेलिया ११९ गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे. ऑस्ट्रेलियाला पहिल्या क्रमांकावर राहण्यासाठी पाकिस्तान विरुद्ध मालिका जिंकावी लागेल. न्यूझीलंडची पुढची मालिका इंग्लंडसोबत जूनमध्ये आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur Bus Accident: मनोरुग्ण प्रवाशानं बसचं स्टेअरिंग ओढलं; दोन स्कूल बस धडाधड धडकल्या

Nashik Earthquake: नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के; शेतजमिनींना भल्या मोठ्या भेगा, घराच्या भिंती थरथरल्या

आंदोलक विद्यार्थ्यांवर AK-47नं गोळीबार, राहुल गांधी यांचा खळबळजनक दावा

कसारा घाटातील बोगद्यात बंद पडली वंदे भारत एक्स्प्रेस; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

52 कोटी भारतीयांच्या ताटातून पौष्टीक आहार गायब, संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT