गयानाच्या प्रोविडेंस स्टेडियमवर भारत आणि वेस्टइंडीज यांच्यातील तिसरा टी -२० सामना पार पडला. ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील सुरुवातीच्या २ सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.
आता तिसऱ्या सामना जिंकून भारतीय संघाने दमदार कमबॅक केल्याचे पाहायला मिळाले आहे. या सामन्यात भारतीय संघाने ७ गडी राखून विजय मिळवला आहे. या विजयानंतर हार्दिक पंड्याने मोठे वक्तव्य केले आहे.
हा सामना झाल्यानंतर हार्दिक पंड्या म्हणाला की, ' एक संघ म्हणून आम्ही ७ फलंदाजांसह खेळण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला जबाबदारी घेऊन खेळावं लागेल, जे आम्ही आज केलं. जर फलंदाज धावा करत असतील तर ८ व्या क्रमांकावर फलंदाज असण्याची आवश्यकता नाही. ' या सामन्यात ८३ धावांची खेळी करणारा सूर्यकुमार यादव विजयाचा हिरो ठरला. दरम्यान सामना झाल्यानंतर हार्दिक पंड्याने सूर्यकुमार यादवचे देखील कौतुक केले आहे.
सूर्यकुमार यादव बद्दल बोलताना हार्दिक पंड्या म्हणाला की, ' सूर्यकुमार यादवने मला सांगितलं की, मला आणि तिलकला एकत्र खेळण्याचा अनुभव आहे. संघात सूर्यकुमार यादव सारखा फलंदाज असणं आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. कारण तो जबाबदारी घेऊन खेळल्याने इतरांनाही आपल्या जबाबदारीची जाणीव होते. ' आपली पहिलीच टी -२० मालिका खेळत असलेला तिलक वर्मा सध्या जोरदार फॉर्ममध्ये आहे. त्याने ३७ चेंडूंचा सामना करत ४९ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने १३ चेंडू शिल्लक ठेवून हा सामना जिंकला.
तसेच तो पूढे म्हणाला की,'हा सामना जिकंणं आमच्यासाठी अतिशय महत्वाचं होतं. हे तिन्ही सामने खूप रोमांचक होते. २ विजय किंवा २ पराभवाने आमच्या योजना बदलत नाहीत.'(Latest sports updates)
भारतीय संघाचे दमदार कमबॅक...
फलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे भारतीय संघाने या सामन्यात एकतर्फी विजय मिळवला. भारतीय संघाकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ८३ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने १० चौकार आणि ४ गगनचुंबी षटकार मारले. तर तिलक वर्मा ४९ धावांवर नाबाद राहिला. शेवटी हार्दिक पंड्याने षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला. यासह मालिकेत १-२ ने कमबॅक केले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.