बॉर्डर गावस्कर सिरीजमध्ये टीम इंडियाने सिरीज गमावली. पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा ६ विकेट्सने पराभव झाला आहे. पाचव्या टेस्ट सामन्यात कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली होती. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने टीमचं नेतृत्व केलं. दरम्यान हा सामना सुरु असताना रोहित शर्माने सांगितलं की, टीममध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या नव्या खेळाडूंना भारतीय टीमचं कर्णधारपद सांभाळण्यासाठी खूप मेहनत करावी लागणार आहे.
बॉर्डर-गावस्कर सिरीजमध्ये रोहित शर्मा खराब फॉर्ममधून जात होता. रोहित शर्माकडून अपेक्षित असलेली फलंदाजी दिसून आली नाही. या सिरीजमध्ये रोहित शर्माच्या फलंदाजीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. दरम्यान यानंतर त्याने पाचव्या टेस्टमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला.
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना रोहित शर्मा म्हणाला, 'टीममध्ये अनेक युवा खेळाडू आहेत पण त्यांना आधी क्रिकेटचं महत्त्व आणि या ठिकाणाचं महत्त्वही समजावं असं मला वाटतं. ती सर्व नवीन मुलं आहेत आणि मला माहित आहे की त्यांना जबाबदारी दिली पाहिजे. पण त्यांना ती कमवावी लागेल. जसा, मी आता या ठिकाणी आहे. बुमराह ज्या पद्धतीने आला आहे. विराट यापूर्वी इथे होता. प्रत्येकाने ती गोष्ट कमावली आहे. कर्णधारपद कोणीही ताटात सजवून दिलेलं नाही आणि कोणालाही ते तसं मिळू नये. त्यांनी मेहनत करावी.
या युवा मुलांमध्ये खूप टॅलेंट आहे. पण त्याचवेळी मला असंही वाटतं की, भारताचा कर्णधार बनणं सोपं नाही. काहीसं प्रेशर आहे मात्र तो खूप मोठा सन्मान आहे, असंही रोहित म्हणाला बुमराहच्या कर्णधारपदावर रोहित शर्मा म्हणाला, 'त्याच्याकडे खेळाबद्दल खूप कल्पना आहेत. तो ज्या प्रकारे आपल्या गोलंदाजीने इतरांसमोर आदर्श ठेवतो तो उत्कृष्ट आहे.'
रोहित शर्मा पुढे म्हणाला, 'बुमराहकडे उत्कृष्ट क्षमता असून तो खेळ समजून घेतो आणि टीमला नेहमी पुढे ठेवतो. गेल्या 11 वर्षांपासून मी त्याला पाहतोय. त्याने आपल्या खेळात आणि विचारात खूप चांगला बदल केला आहे. तो कोणत्या पद्धतीने गोलंदाजी करतो याकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे. पाच-सहा-आठ महिन्यांपूर्वी ज्या प्रकारचे कर्णधारपद मी करत होतो, तीच मानसिकता, विचारसरणी, विचारप्रक्रिया अजूनही आहे, पण कधी कधी निकाल येत नाही, तेव्हा टीका होते.
रोहितच्या म्हणण्यानुसार, आम्ही भारतात राहतो, ज्या ठिकाणी 140 कोटी लोक आम्हाला जज करतील. परंतु मला कर्णधारपदाबाबत माझ्या पद्धती आणि विचारसरणी बदलायच्या नाहीत. प्रत्येकाची मानसिकता टीमसाठी सामना जिंकण्याची आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.