भारत विरुद्ध वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना रविवारी पार पडला. या निर्णायक सामन्यात भारतीय संघाला ८ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला.
या पराभवासह भारतीय संघाने २-३ ने टी -२० मालिका गमावली आहे. गेल्या १७ वर्षात पहिल्यांदाच ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील ३ सामने गमावले आहेत. दरम्यान या सुमार कामगिरीनंतर माजी खेळाडूने हार्दिक पंड्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्राने हार्दिक पंड्याची शाळा घेतली आहे. त्याने आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले की, ' जेव्हा तुम्ही इथे गोलंदाजी करण्यासाठी आले तेव्हा गोष्ट नवीनच होती. गेल्या सामन्यात अक्षर पटेलने पहिले षटक टाकले, या सामन्यात त्याला एकही षटक टाकता आले नाही. ज्याप्रकारे अक्षर पटेलचा वापर केला गेला आहे, आम्हाला खरंच माहीत नाही असं का झालं. '
तसेच तो पुढे म्हणाला की, ' तुम्ही असं म्हणता की, निकोलस पूरन फलंदाजीला असेल तर कुलदीप यादव गोलंदाजी करेल. नाहीतर अक्षर पटेल आपले षटक पूर्ण करेल. जर निकोलस पूरन वरच्या फळीत फलंदाजीला आला तर तुम्ही काय कराल? जेव्हा अर्शदीप सिंगने काइल मेयर्सला बाद केलं त्यावेळी तो वरच्या फळीत फलंदाजीला आला होता. अक्षर पटेलचा वापर केला जात नाहीये. असं वाटतंय आपण १० खेळाडूंसोबत खेळतोय.' (Latest sports updates)
तिलक वर्माने निकोलस पूरनला बाद केल्यानंतर १५ व्या षटकात अक्षर पटेलला गोलंदाजी देण्यात आली. या षटकात त्याने ८ धावा खर्च केल्या. त्यानंतर त्याला एकही षटक टाकण्याची संधी मिळाली नाही. मुकेश कुमारला देखील नव्या चेंडूने गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. वनडे मालिकेत जेव्हा त्याने नव्या चेंडूने गोलंदाजी केली. त्यावेळी त्याने विकेट्स काढून दिले होते. असं आकाश चोप्राने आपल्या युट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.