सरकारनामा

केंद्र सरकारकडून गरिबांची थट्टा, धान्याऐवजी लाभार्थ्यांच्या पदरात वाळू आणि खडे

साम टीव्ही न्यूज

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने प्राधान्य लाभार्थी कुटुंबांसाठी 2 रुपये किलोने गहू आणि 3 रुपये प्रतिकिलोने तांदूळ देण्याचं जाहीर केलंय. मात्र या योजनेतून जो गहू आणि तांदूळ लाभार्थ्यांना मिळतोय त्यात खडे आणि वाळूच जास्त असल्याचं उघड झालंय. त्यामुळे केंद्र सरकारच्या योजनेतून लाभार्थ्यांच्या पदरात दिलासा पडण्याऐवजी खडे आणि वाळूच पडलेली दिसतेय.

केंद्र सरकारच्या या योजनेमुळे कोरोनाच्या संकटात गोरगरीब जनतेला दिलासा मिळाला होता, मात्र दगड आणि वाळू मिसळलेला गहू, तांदूळ मिळत असल्याने लाभार्थ्यांची घोर निराशा झालीय. यावर आता प्रशासन काय तोडगा काढतंय हे पाहणं महत्त्वाचंय.
स्थानिक पातळीवरचे रेशनिंग दुकानदार नफेखोरीसाठी तांदूळ आणि गव्हात खडे मिसळत असल्याचा आरोप होतोय.  खरंतर, सध्या देशभरात सुमारे 8 कोटी कुटुंबं या योजनेअंतर्गत येतात. म्हणजेच सरासरी 32 कोटी लोक या योजनेचे लाभार्थी आहेत. याचा सरळसरळ अर्थ हाच होतो की, तब्बल 32 कोटी लोकांच्या पोटाशी आणि पर्यायाने आरोग्याशी खेळ मांडला गेलाय. त्यामुळे सरकारच्या या योजनेची माती कुणी केलीय आणि गोरगरीब जनतेच्या जेवणात खडे कोण मिसळतंय याचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई होणं गरजेचंय.

Web Title -marathi news The mockery of the poor by the central government. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BCCI शी चर्चा! नको रे बाबा; कारवाईनंतर केकेआरचा गोलंदाज राणाची क्रिकेट बोर्डावर टीका

Unseasonal rain : चंद्रपूर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; चंद्रपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पूल गेला वाहून

EVM बिघाड, राडा, तुंबळ हाणामारी, व्हिडिओ आणि आरोपांच्या फैरी; तिसऱ्या टप्प्यात कुठं काय घडलं?

IPL 2024 DC vs RR : एकाच षटकात २ विकेट घेत कुलदीपने पालटली बाजू; घरच्या मैदानावर दिल्लीने राजस्थानचा २० धावांनी केला पराभव

Bhayandar News : सोसायटीचं फायर टेंडर दिलं नाही म्हणून अग्निशमनच्या अधिकाऱ्यांने केली बेदम मारहाण, खजिनदार गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT