Anant Chaturdashi 2022 Saam Tv
धार्मिक

Anant Chaturdashi 2022 : अनंत चतुर्दशीला का केले जाते गणपतीचे विसर्जन, जाणून घ्या

हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार अनंत चतुर्थीला भगवान श्रीहरीच्या अनंत स्वरूपाची पूजा केली जाते आणि त्यानंतर लोक त्यांच्या हातात अनंत बांधतात.

कोमल दामुद्रे

Anant Chaturdashi 2022 : हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार अनंत चतुर्थीला भगवान श्रीहरीच्या अनंत स्वरूपाची पूजा केली जाते आणि त्यानंतर लोक त्यांच्या हातात अनंत बांधतात.

पौराणिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान विष्णूच्या अनंत स्वरूपाची पूजा केली जाते आणि उपवास केला जातो. त्यानंतर अनंत सूत्र किंवा अनंता हातात बांधले जाते. स्त्रिया डाव्या हाताला आणि पुरुष उजव्या हातात अनंत घालतात. हे अनंत सूत्र दीर्घ आयुष्य आणि शाश्वत जीवनाचे प्रतीक मानले जाते.

पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिथीला येणारा हा सण महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे. पौराणिक कथेनुसार महाभारतात अनंत चतुर्दशीची सुरुवात झाली. हा सण भगवान विष्णूचा दिवस म्हणून साजरा केला जातो. श्रीहरीने ताल, अटल, प्राण, सुतला, तलताल, रसातल, पाताल, भुव, जना, तप, सत्य, महा या नावांनी जग निर्माण केले. भगवान विष्णू त्यांचे पालनपोषण आणि संरक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या अवतारात या जगात आले. म्हणूनच त्याचे नाव अनंत आहे.जे सनातन धर्मावर विश्वास ठेवतात ते अनंत चतुर्दशीचा सण पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने साजरा करतात.

अनंत चतुर्दशीचा दिवस भगवान विष्णूंनी विश्वाच्या निर्मितीसाठी १४ लोकांची निर्मिती केली. हे १४ लोकं तल, अतल, वितल, सुतल, सलातल, रसातल, पाताल, पृथ्वी, भव:, स्व:, जन, तप, सत्य, महा आहेत, म्हणून भगवान विष्णूने या सर्व जगाचे रक्षण करण्यासाठी अनंत रूप धारण केले. यामुळे देव अनंत स्वरूपात दिसू लागला. विधिवत हे व्रत केल्याने व्यक्तीचे सर्व दुःख दूर होतात. या दिवशी उपवास करणाऱ्या व्यक्तीने विष्णू सहस्त्रनाम मंत्राचा जप करावा. हे करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होतात. पौराणिक श्रद्धेनुसार हे व्रत पहिल्यांदा महाभारत काळात सुरू झाले होते.

व्रत करण्याची विधी -

अनंत चतुर्दशीला सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्वच्छ (Clean) कपडे घाला. कोणत्याही मंदिरात किंवा घरात पूजा करा. पूजेसाठी कलशाची स्थापना करावी. कुशावर धातूचे पात्र ठेवून भगवान अनंतांची स्थापना करावी. कापूस किंवा रेशमी धाग्याला हळद आणि केशराने रंगवून त्यात १४ गाठी घालून रक्षासूत्र तयार करा. फळे, फुले, हळद, अक्षता, प्रसाद इत्यादी अर्पण करून विधिनुसार त्यांची पूजा करावी. अनंत चतुर्दशीची व्रत कथा वाचावी.

अनंत चतुर्थीला गणपतीला निरोप का देतात ?

गणेश (Ganesh) चतुर्थीच्या दिवशी स्थापन केलेल्या गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशी केले जाते. यामागची पौराणिक कथा अशी आहे की, ज्या दिवशी वेद व्यासांनी महाभारत लिहिण्यासाठी गणेशजींना महाभारताची कथा कथन करण्यास सुरुवात केली, ती भाद्र शुक्ल चतुर्थी तिथी होती.

कथा सांगताना वेद व्यासांनी डोळे मिटले आणि सलग १० दिवस ते गणेशजींना कथा सांगत राहिले आणि गणेशजी लिहित राहिले. १० व्या दिवशी जेव्हा वेदव्यासजींनी डोळे उघडले, तेव्हा त्यांनी पाहिले की गणेशजींच्या शरीराचे तापमान एका ठिकाणी बसून सतत लिहित असताना लक्षणीय वाढले आहे. अशा परिस्थितीत गणपतीला शीतलता देण्यासाठी वेद व्यासांनी थंड पाण्यात डुबकी घेतली. जिथे गणपती वेदव्यासांच्या सांगण्यावरून महाभारत लिहित होते, तिथे जवळच अलकनंदा आणि सरस्वती नद्यांचा संगम होता. ज्या दिवशी वेद व्यासांनी सरस्वती आणि अलकनंदाच्या संगमात स्नान केले, तो दिवस अनंत चतुर्दशीचा होता. हेच कारण आहे की चतुर्थीला स्थापना झाल्यानंतर अनंत चतुर्दशीला गणपतीचे विसर्जन केले जाते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रक घरात घुसला

Influencer Anita Bishnoi: रडत लाईव्ह आली अन् उचललं टोकाचं पाऊल; इन्फ्लुएंसर अनीता बिश्नोईचा लाईव्हमध्ये आत्महत्येचा प्रयत्न

New Highway: २४२०० कोटींचा महामार्ग, ४ राज्यातून जाणार; मोदी सरकारचा मास्टरप्लान, कुणाला होणार फायदा?

एका महिन्यात कंबरेपर्यंत वाढतील तुमचे केस, हा देसी उपाय करून बघा

Shocking : नवी मुंबईत भयंकर घडलं! १७ वर्षीय दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडिता ४ महिन्यांची गरोदर

SCROLL FOR NEXT