नुकतेच शिक्षण पूर्ण झालंय आणि नोकरी शोधताय तर ही बातमी खास तुमच्यासाठी. सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. न्यू इंडिया अश्युरन्स कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी आहे. चांगल्या पगाराची नोकरी करण्याची ही चांगली संधी आहे. (Government Job)
न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडमध्ये सहाय्यक पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. याबाबत नोटिफिकेशन new.india.co.in या वेबसाइटवर देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी तुम्ही एकदा आली आहे. (NIACL Recruitment)
न्यू इंडिया अॅश्युरन्समधील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच उमेदवारांना त्यांच्या प्रदेशातील प्रादेशिक भाषेचे ज्ञान असावे. २१ ते ३० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. (New India Assurance Company Recruitment)
असिस्टंट पदासाठी उमेदवारांना ४० हजार रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड पूर्व परीक्षा, मुख्य परिक्षेद्वारे केली जाणार आहे.
या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्ही new.india.co.in या वेबसाइटवर जा. त्यानंतर Apply Online वर क्लिक करा. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि शुल्क भरा.
दूरसंचार विभाग भरती (Telecommunication recruitment)
दूरसंचार विभागात सध्या नोकरीची सुवर्णसंधी आहे. दूरसंचार विभागात टीईएस ग्रु बी अंतर्गत डिविजनल इंजिनियर पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ डिसेंबर २०२४ आहे.
दूरसंचार विभागात ४८ रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. देशातील विविध ठिकाणी ही भरती होणार आहे. मुंबईत ४ रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना चांगले पॅकेज मिळणार आहे. या नोकरीसाठी ४७००० ते १५१००० रुपये पगार मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.