Arvind Kejriwal's Bail News: अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन; लोकसभा निवडणूक प्रचार करणार, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Arvind Kejriwal On Congress ANI
देश विदेश

Arvind Kejriwal: लोकसभा निवडणुकीनंतर आप-काँग्रेस युती तुटणार? अरविंद केजरीवाल यांनी केलं सूचक वक्तव्य

साम टिव्ही ब्युरो

इंडिया आघाडीचा भाग असलेले आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी आघाडीच्या भवितव्याबाबत मोठे वक्तव्य केलं आहे. अरविंद केजरीवाल म्हणाले की, आपची काँग्रेससोबतची युती कायमस्वरूपी नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दावा केला की, 4 जून रोजी धक्कादायक निकाल येतील. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी जिंकेल. दिल्लीत आप आणि काँग्रेसमध्ये युती आहे, तर शेजारच्या पंजाब राज्यात दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवत आहेत.

काँग्रेस आणि आप युतीबद्दल बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, आम्ही लग्न केलेलं नाही. आमचं अरेंज मॅरेज किंवा लव्ह मॅरेज झालेलं नाही. देश वाचवण्यासाठी 4 जूनपर्यंत निवडणूक लढण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. भाजपचा पराभव करणे आणि सध्याच्या राजवटीची हुकूमशाही आणि गुंडगिरी संपवणे हे आमचे सध्याचे उद्दिष्ट आहे.

ते म्हणाले, देश वाचवणे महत्त्वाचे आहे. जिथे जिथे भाजपचा पराभव करण्यासाठी युतीची गरज होती, तिथे आप आणि काँग्रेसने एकत्र येऊन उमेदवार उभे केले. पंजाबमध्ये भाजपचे अस्तित्व नाही.

अटकेनंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याच्या प्रश्नावर केजरीवाल म्हणाले की, मी घाबरत नाही आणि दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पुन्हा तुरुंगात जाणे हा माझ्यासाठी मुद्दा नाही. या देशाचे भवितव्य धोक्यात आहे. ते मला हवे तोपर्यंत तुरुंगात ठेऊ शकतात. भाजपला हेच हवे आहे, त्यामुळे दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahavikas Aghadi: महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?

Maharashtra Monsoon Session : फ्लेमिंगोंच्या मृत्यूची अधिवेशनात चर्चा; कारणं शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना

Manoj Jarange Patil: शांतता रॅलीआधी खासदार भुमरे आणि अशोक चव्हाण जरांगे पाटलांच्या भेटीला; चर्चांना उधाण

Mumbai News : DRI ने केला रक्तचंदन तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तब्बल आठ मेट्रिक टन रक्तचंदन जप्त

Pani Puri and Cancer : पाणीपुरी खाल्ल्याने होऊ शकतो कर्करोग? वैद्यकीय तज्ज्ञ काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT