Temperature Update Saam Tv
देश विदेश

Weather Update : देशातील ६ राज्यात उन्हाचा कडाका वाढणार; जाणून घ्या, आज कसं असेल हवामान?

देशभरात फेब्रुवारी महिन्यापासूनच हवामानात बदल दिसून येत आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : देशभरात फेब्रुवारी महिन्यापासूनच हवामानात बदल दिसून येत आहे. अनेक राज्यात गुलाबी थंडीच्या ऐवजी तापमानात वाढ होताना दिसून येत आहे. फेब्रुवारी महिन्यातच अनेक राज्यात तापमानात वाढ होताना दिसून येत आहे. अनेक ठिकाणी तापमान ३५ अंश सेल्सिअस पर्यंत येऊन ठेपलं आहे. त्यामुळे नागरिकांना हिवाळ्याच्या महिन्यात उन्हाळ्याचा अनुभव येऊ लागला आहे. (Latest Marathi News)

हिवाळा ऋतु संपण्याच्या आधीच अनेक राज्यातील नागरिकांना उन्हाळ्याचा अनुभव येऊ लागला आहे. गुलाबी थंडी असलेल्या राज्यातील नागरिकांना उन्हाचा अनुभव येत आहे. बदलत्या हवामानाचा (Weather) फटका गव्हाच्या पिकाला बसण्याची शक्यता आहे.

देशाची राजधानी दिल्लीमध्ये १३ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होण्याची शक्यता आहे. यावेळी आकाश निरभ्र राहील. पावसाची अजिबात शक्यता नाही.

लखनऊमध्ये किमान तापमानाची शक्यता १४ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होण्याची शक्यता आहे. चंदीगडमध्ये किमान तापमान १६ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस तापमान नोंद होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या ट्विटनुसार, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरातचा काही भाग, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये कमाल तापमान हे ३५ ते ३७ अंश सेल्सिअस नोंद होण्याची शक्यता आहे. तर उत्तर पश्चिम आणि मध्य भारतातील राज्यात तापमान रोजच्या तापमानापेक्षा ३ ते ४ अंश सेल्सिअस अधिक नोंद होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa T20 WC: दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली; 111 धावांवर अख्खा संघ All Out

Monday Horoscope : थकवा, चिडचिड आणि शब्दांवर नियंत्रण ठेवा; ५ राशींच्या लोकांनी वाणीवर संयम ठेवा,अन्यथा...

बाजारातून घरी परतताना काळाचा घाला, ५ मजुरांचा जागीच मृत्यू; अपघाताचं कारण आलं समोर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना आता १५०० नाहीतर २१०० रुपये मिळणार; अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार घोषणा?

55 वर्षांचा विरह, रक्ताची नाती पुन्हा एकत्र, 55 वर्षांनंतर भेटीची कहाणी, दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी

SCROLL FOR NEXT