Unified Pension Scheme 
देश विदेश

Unified Pension Scheme: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; नव्या पेन्शन योजनेला केंद्राची मंजुरी

Bharat Jadhav

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतलाय. सरकारने नव्या पेन्शन योजनेची घोषणा केली असून या योजनेला आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आलीय. या योजनेंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या वर्षातील वेतनाच्या किमान ५० टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाणार असल्याचा निर्णय सरकारने घेतलाय. या योजनेमुळे जवळपास २३ लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे. ही योजना १ एप्रिल २०२५ पासून लागू होणार आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीसंदर्भात माहिती देताना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, १० वर्षे सेवा केलेल्यांना १०,००० रुपये पेन्शन मिळेल. सेवेत असताना कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या पत्नींना ६० टक्के पेन्शन दिली जाईल. याबाबतची अमंलबजावणी करणं राज्य सरकारही अवलंबून असणार आहे. कर्मचाऱ्यांवर या योजनेचा बोजा पडणार नाही. जर एखाद्या कर्मचाऱ्याने किमान २५ वर्षे काम केले तर निवृत्तीच्या आधीच्या १२ महिन्यांच्या सरासरी पगाराच्या किमान ५० टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाणार आहे. पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला मृत्यूच्या वेळी मिळालेल्या पेन्शनपैकी ६० टक्के रक्कम मिळेल.

सर्व NPS लोकांना UPS वर जाण्याचा पर्याय मिळेल.एनपीएसच्या स्थापनेपासून जे सेवानिवृत्त झाले आहेत किंवा निवृत्त होणार आहेत त्यांनाही ही योजना लागू होईल. याची थकबाकी सरकार भरणार आहे. २०००४ पासून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाही हा लाभ मिळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT