Earth Temperature Increase Saam tv
देश विदेश

Earth Temperature Increase: पुढील पाच वर्षात पृथ्वीचं तापमान भयंकर वाढणार, मानवाचं काय होणार?

पुढील पाच वर्षात पृथ्वीचं तापमान भयंकर वाढणार, मानवाचं काय होणार?

Satish Kengar

Temperature Today: पुढील पाच वर्षात मानवाला पृथ्वीवर राहणं कठीण होणार आहे. यामागचं कारण म्हणजे पृथ्वीचं वाढणार तापमान आहे. जागतिक हवामान संघटनेने (WMO) बुधवारी एक धक्कदायक अहवाल प्रसिद्ध केला आहे.

यामध्ये सांगण्यात आलं आहे की, येत्या पाच वर्षात संपूर्ण जगाचे सरासरी तापमान १.५ अंश सेल्सिअसने वाढेल. यामुळे मोठ्या प्रमाणात उष्णताही वाढणार आहे.

डब्लूएमओने (WMO) ३० वर्षांच्या सरासरी जागतिक तापमानाच्या आधारे हा खुलासा केला आहे. २०२७ पर्यंत जगाचे तापमान दीड अंश सेल्सिअसने वाढणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे. याची ६६ टक्के शक्यता असल्याचंही संघटनेने म्हटलं आहे. (Latest Marathi News)

ब्रिटनच्या मेट ऑफिस हॅडली सेंटरमधील लॉन्ग रेंज प्रेडिक्शन प्रमुख अॅडम स्कॅफे म्हणाले की, पुढील चार ते पाच वर्षांत आपल्याला उष्णतेची ऐतिहासिक विक्रमी पातळी पाहायला मिळू शकते. तापमान दीड अंश सेल्सिअसच्या वर जाऊ शकतो. गेल्या वर्षी आलेल्या अहवालात याची शक्यता ५०-५० होती. पण पुन्हा केलेल्या अभ्यासानुसार आता ही शक्यता ६६ टक्के इतकी झाली आहे. ज्या भयानक अहवालात ही गोष्ट उघड झाली आहे, त्याला 'ग्लोबल अॅन्युअल टू डेकॅडल क्लायमेट अपडेट', असे नाव देण्यात आले आहे.

दर पाच वर्षांतील एक वर्ष अत्यंत उष्ण असतो

डब्लूएमओनेने आणखी एक चिंताजनक इशारा जारी केला आहे. ज्यामध्ये पुढील पाच वर्षांत विक्रमी उष्माघात होण्याची ९८ टक्के शक्यता असल्याचे म्हटले आहे. वर्ष २०१६ पासून ही प्रक्रिया सुरू झाली आहे. हे एक मोठे हवामान संकट आहे, ज्याला बहुतेक देश गांभीर्याने घेत नाहीत, असं डब्लूएमओचं म्हणणं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसाला मारहाण, मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कॉलर पकडून ओढत नेलं अन्...

Akola Accident : अकोल्यात अपघाताची मालिका सुरूच, 2 दिवसात तिघांचा मृत्यू तर दोन जखमी

Maharashtra Live News Update: आरक्षणाच्या लढाईनंतर मनोज जरांगे नारायण गडावर

Bads Of Bollywood: शाहरुख खानपासून ते करण जोहरपर्यंत; आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणार फिल्म इंडस्ट्रीचा खरा चेहरा

जुना वाद टोकाला; व्यापाऱ्याची निर्घृण हत्या, गोळ्या झाडून संपवलं, मास्टरमाईंडसह ६ जण ताब्यात

SCROLL FOR NEXT