'त्या' 12 आमदारांच्या निलंबन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी
'त्या' 12 आमदारांच्या निलंबन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी Saam Tv
देश विदेश

'त्या' 12 आमदारांच्या निलंबन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संतोष शाळीग्राम

नवी दिल्ली - भाजपच्या १२ आमदारांना विधानसभेत गोंधळ आणि गैरवर्तन केल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होती. मात्र खानविलकर आणि सी. टी. तिवारी यांच्या खंडपीठापुढील सर्व सुनावण्या तहकूब करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी आता मंगळवारी होणार आहे, अशी माहिती भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी दिली. या सुनावणीसाठी आशिष शेलार दिल्लीत आले आहेत.

हे देखील पहा -

विरोधी पक्ष भाजपच्या सदस्यांनी पावसाळी अधिवेशन सुरु असताना विधानसभेत गोंधळ घातला होता. भाजपने ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतली होती. विधानसभा कामकाजाच्या पहिल्या दिवशी भाजपकडून सभागृहात गोंधळ घालण्यात आला होता. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की झाली असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर भाजप नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती या प्रकरणावर आज सुनावणी होती मात्र ती तहकूब झाल्याने या प्रकरणाची सुनावणी आता मंगळवारी होणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : उत्तर मध्य मुंबईतून उज्वल निकम याचा उमेदवारी अर्ज दाखल

Kalyan Lok Sabha | उमेदवारीचा गोंधळ, वैशाली दरेकरांची पहिली प्रतिक्रिया!

Money Tips: पैसे उजव्या हाताने का देतात? कारण वाचा

Mumbai Metro: मतदारांना विशेष सवलत; मतदानाच्या दिवशी मेट्रो तिकिटावर मिळणार १० टक्के सूट

Sanjay Nirupam : संजय निरुपम २० वर्षांनंतर पुन्हा शिवसनेत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT