केरळमध्ये पावसाचे थैमान, 3 जिल्ह्यांत रेड अलर्ट Saam Tv
देश विदेश

केरळमध्ये पावसाचे थैमान, 3 जिल्ह्यांत रेड अलर्ट

शनिवारी रात्रीपासून केरळच्या काही भागामध्ये होत असलेल्या जोरदार पावसाने हवामान विभागाने इडुक्की, एर्नाकुलम आणि त्रिसूर या जिल्ह्यांना रविवारसाठी रेड अलर्ट घोषित करण्यात आला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : शनिवारी रात्रीपासून केरळच्या काही भागामध्ये होत असलेल्या जोरदार पावसाने हवामान विभागाने इडुक्की, एर्नाकुलम आणि त्रिसूर या जिल्ह्यांना रविवारसाठी रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. केरळमध्ये याअगोदर आलेल्या पुरामध्ये १८ लोकांचा मृत्यू झाला होता. मुख्यमंत्री पी. विजयन यांनी फेसबुक पोस्टमध्ये सांगितले आहे की, जोरदार पावसाने भूस्खलन आणि अन्य धोकादायक घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासन आणि जनतेने अति सावधान राहावेत.

हे देखील पहा-

पूरप्रवण आणि भूस्खलन होणाऱ्या भागात लोकांना सुरक्षित ठिकाणी किंवा जवळच्या मदत छावण्यात पाठविण्यात यावे. मुख्यमंत्री विजयन यांनी जिल्हाधिकारी आणि अन्य अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आले आहे. जोरदार पावसामुळे साबरीमला या ठिकाणी श्री अय्यप्पा मंदिर दर्शनाकरिता पुढील ३ ते ४ दिवस भाविकांची संख्या मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे यामध्ये सांगण्यात आले आहे.

जोरदार पावसामुळे केरळ मधील विविध धरणांची पाणी पातळी धोक्याच्या पातळीपर्यंत वाढली आहे. यामुळे सरकारने चेरुथोनी धरणाचा एक दरवाजा काल दुपारी उघडण्यात आला आहे. केरळचे जलसंसाधन मंत्री रोशी ऑगस्टिन यांंनी फेसबुकवर पोस्टमध्ये सांगितले आहे की, केरळच्या दक्षिण भागात जोरदार पावसामुळे धरणामधील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचा एक दरवाजा ४० सेंटीमीटर उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate: मोठी बातमी! रमीचा डाव उलटला, माणिकराव कोकाटेंचं कृषिमंत्री पद गेलं

Indian Railways Updates: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या एक्सप्रेसची आसान व्यवस्था बदलली; प्रवास होणार आरामदायी

Ganpati Special Train 2025 : गणपतीत कोकणात जाताव? मध्य रेल्वेने मोठी घोषणा, वाचा सविस्तर

Daya Nayak: सलाम दया नायक!" 'एन्काउंटर स्पेशलिस्ट' दया नायक यांचा वर्दीतील प्रवास थांबला

Mumbai News : मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतले ४ बळी; समस्या कधी संपणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT