RBI Decision on Rs 2000 Note
RBI Decision on Rs 2000 Note Saam TV
देश विदेश

RBI Decision on Rs 2000 Note: ५०० च्या नोटांचा भाव वाढला; ३ महिन्यांत तब्बल १६५ कोटी नोटा छपाईचं टार्गेट

Ruchika Jadhav

अभिजीत सोनवणे

RBI Decision on 2000 Note: आरबीआयने २००० रुपयांच्या नोटांची छपाई थांबवली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा ५०० रुपयांच्या नोटांची छपाई वाढवण्याची गरज आहे. अशात अर्थ मंत्रालयामार्फत करन्सी नोट प्रेसला ३ महिन्यात नोटा छपाईचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. (RBI on 2000 Rupee note)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नाशिकच्या करन्सी नोट प्रेसला ३ महिन्यात ५०० रुपयांच्या १६५ कोटी नोटा छपाईचं उद्दिष्ट दिलं आहे. २ हजारांची नोट बंद होणार असल्यानं ५०० रुपयांच्या नोटांची मागणी वाढणार आहे. अर्थ मंत्रालयाने नाशिक करन्सी नोट प्रेसला १९५ कोटी नोटांच्या छपाईच उद्दिष्ट दिलं आहे. ५०० रुपयांच्या ३० कोटी नोटांची छपाई आत्तापर्यंत पूर्ण झाली आहे. उर्वरित १६५ कोटी नोटांची छपाई ३ महिन्यात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

ज्यांच्याकडे 2000 नोटा आहेत त्यांच्यासमोरील पर्याय काय?

>> 2000 रुपयांच्या नोटा बँक खात्यात जमा करू शकतात किंवा बँकेच्या शाखेत जाऊन इतर नोटांद्वारे बदलू शकतात.

>> बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्याबाबत कोणतेही निर्बंध नाहीत. बँका याबाबत स्वतंत्रपणे नियम जारी करतील.

>> 23 मे 2023 पासून 2000 रुपयांच्या नोटा 20000 रुपयांच्या मर्यादेपर्यंत बदलता येतील.

>> ज्यांच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 रुपयांची नोट बदलू शकतात. आरबीआयने यासंदर्भात बँकांना स्वतंत्रपणे मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

>> 23 मे 2023 पासून, RBI च्या 19 प्रादेशिक कार्यालयांमध्ये 20000 रुपयांच्या मर्यादेपर्यंत, 2000 रुपयांची देवाणघेवाण करता येईल.

>> RBI ने सर्वसामान्य लोकांना 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 रुपयांची नोट बदलून घेण्यासाठी किंवा बँकेत जमा करण्याचे आवाहन केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court: ...तर मानधन सोडा, घशाला आराम द्या; रोहतगींच्या त्या विनंतीवर CJI चंद्रचूड यांचं उत्तर

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! शतकी खेळीनं मुंबईच्या लल्लाटी विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

SCROLL FOR NEXT