यामिनी साम प्रतिनिधी
आखाती युद्धाचा धोका. इंधन पुरवठ्यावर संकट. जगभरात आर्थिक मंदीची चर्चा, नोकरकपातीची टांगती तलवार अशा अस्थिर वातावरणात आता देशाच्या विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या दाव्यानं नवी राजकीय खळबळ उडवलीये. कारण राहुल गांधींनी थेट भारतावर आर्थिक संकट घोंघावत असल्याचा दावा केलाय. एवढंच नव्हे तर सरकार जाणार आणि देशात आणीबाणी लादली जाणार असल्याचा खळबळजन दावाही राहुल गांधींनी केलाय.
तर भाजपनं जोरदार पलटवार करत राहुल गांधींची तुलना अखेरचे बादशाह बदादुर शाह जफर यांच्याशी केलीय. राहुल गांधींनी आर्थिक संकटाबाबत पुनरूच्चार केलाय. मात्र पहिल्यांदाच थेट मोदींच्या भवितव्याबाबतच मोठा दावा केलाय. त्यामुळे आगामी काळात केंद्रात काय राजकीय घडामोडी घडतात आणि राहुल गांधींचं भाकीत किती खरं ठरतं याकडे देशाचं लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.