दिलासादायक बातमी! लवकरच डाळी आणि खाद्यतेल स्वस्त होणार Saam Tv
देश विदेश

दिलासादायक बातमी! लवकरच डाळी आणि खाद्यतेल स्वस्त होणार

भारताची ओळख एक कृषी निर्यातक देश म्हणून निर्माण

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांनी सोमवारी दिलेल्या माहितीवरून कोरोनाच्या Corona संकटकाळातही भारत पहिल्यांदाच कृषी निर्यातीत पहिल्या दहा देशांच्या यादीमध्ये आहे. आता भारताची ओळख एक कृषी निर्यातक देश म्हणून निर्माण होत आहे.

हे देखील पहा -

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा नववा हप्ता जारी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला डाळी आणि खाद्यतेलाच्या उत्पादनात आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खाद्यतेलात आत्मनिर्भरता आणण्यासाठी मिशन-ऑइल पाम मिशनची घोषणा केली आहे. यामध्ये ११ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणुकीची घोषणा यावेळी करण्यात आली आहे. सरकार आणि शेतकरी यांच्या समन्वयामुळे देशातील अन्न भांडार भरलेले आहे असे यावेळी ते म्हणाले.

सुरुवातीच्या काळात डाळ आयात करावी लागत असे, मात्र आता या क्षेत्रात खूप बदल झाले आहेत. गेल्या ६ वर्षात डाळीच्या उत्पादनात आता जवळपास ५० टक्क्यांची वाढ झाली आहे. जे काम आपण डाळींसंदर्भात करुन दाखवले आता तेच काम खाद्यतेलांच्या उत्पादनाबाबतीत करायचा आहे असे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महायुती कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्रच लढणार

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

SCROLL FOR NEXT