President Droupadi Murmu delivering her Independence Day eve address highlighting Operation Sindoor and India’s democratic values. saam tv
देश विदेश

President Droupadi Murmu: संविधान, लोकशाही....ऑपरेशन सिंदूर ते पहलगाम हल्ला; राष्ट्रपतींच्या संबोधनातील ठळक मुद्दे

President Droupadi Murmu Speech: स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ऑपरेशन सिंदूर आणि भारताच्या लोकशाही मूल्यांवर प्रकाश टाकला.

Bharat Jadhav

  • राष्ट्रपती मुर्मू यांनी स्वातंत्र्यदिन पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधित केलं.

  • भाषणात ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम हल्ल्याचा उल्लेख केला.

  • संविधान आणि लोकशाहीला सर्वश्रेष्ठ ताकद आणि अभिमानाचे प्रतीक म्हटलं.

  • १५ ऑगस्ट हा फक्त उत्सव नसून गर्वाचा दिवस असल्याचं सांगितलं.

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी देशवाशियांना संबोधित केलं. यावेळी ऑपरेशन सिंदूर आणि भारत सरकारच्या कामांचे कौतुक केलं. १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य पर्व नाहीये तर प्रत्येक भारतीयासाठी गर्वाचे प्रतिक आहे. संविधान आणि लोकशाही हे आमच्यासाठी सर्वेच्च आहे. या दोन्ही गोष्टी आमच्या ताकद सुद्धा आहेत, असं राष्ट्रपती म्हणाल्या.

स्वातंत्र्यानंतर देशातील प्रौढ लोकांना मताधिकार मिळाला आणि भारत लोकशाहीच्या मार्गावर चालू लागला. या मार्गात अनेक आव्हाने आली तरीही त्यात देश यश मिळवलं. राष्ट्रपती यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यातील वीरांना नमन करत त्यांच्या बलिदानामुळे आपल्याला ७८ वर्षाआधी स्वातंत्र्य मिळाल्याचं म्हणाल्या.

यावेळी राष्ट्रपती मुर्मू यांनी अलिकडच्या ऑपरेशन सिंदूरचाही उल्लेख केला. दहशतवादाविरुद्ध मानवतेच्या लढाईचे उदाहरण म्हणून इतिहासात ऑपरेशन सिंदूरची नोंद केली जाईल. ऑपरेशन सिंदूर हे पहलगाम हल्ल्याचं चोख प्रत्युत्तर होते. या ऑपरेशनमुळे भारतीय लष्कर देशाचं संरक्षण करण्यास सक्षम असल्याचं सिद्ध झालं.

पहलगाम हल्ल्यात निर्दोष व्यक्तींची हत्या

या वर्षात आपल्याला दहशतवादाचा सामना करावा लागला. काश्मीरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या निर्दौष नागरिकांची हत्या करण्यात आली हे अमानवीय होती. या हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिलं. ऑपरेशन सिंदूरमुळे आपले सैन्य कोणत्याही परिस्थीत दहशतवाद्यांचा सामना करण्यास तयार असल्याचं दाखवून दिलं.

लष्कराने तंत्रज्ञानाच्या क्षमतेसह सीमेपार दहशतवाद्यांच्या स्थळांना नष्ट केलं. भारताकडून देण्यात आलेल्या उत्तरात भारताची एकता दिसून आली. जे भारताला विभाजित करण्याचा प्रयत्न करत होते त्यांना भारतीय लोकांनी एकतेतून उत्तर दिलं. ऑपरेशन सिंदूर हे आत्मनिर्भर भारत मोहिमेसाठी महत्त्वाचं ठरले. आत्मनिर्भर भारत मोहिमेच्या माध्यमातून संरक्षणासाठी शस्त्र तयार करण्यात आली.

स्वदेशी उत्पादनात महत्त्वपूर्ण स्तर प्राप्त केलाय. संरक्षणासाठी लागणारे शस्त्र निर्माण करण्यात भारत आत्मनिर्भर झाल्याचं या ऑपरेशनमधून दिसून आलं. १५ ऑगस्ट ही तारीख देशाच्या सामूहिक स्मृतीत कोरलेली ऐतिहासिक तारीख आहे. प्रदीर्घ वसाहतवादी राजवटीत भारतीयांनी पिढ्यानपिढ्या या दिवसाचे स्वप्न पाहिले होते. त्यांचा संघर्ष आणि जिद्द, आशावादाने भरलेला होता, असे राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India-China : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका; भारताची चीनशी जवळीक, व्यापारात मोठी घडामोड घडणार?

Crime News: सून बाथरूममध्ये गेली, सासरा आधी एकटक पाहत बसला; नंतर आत शिरला अन्...

Police Officers Transfer : राज्यात बदल्यांचा धडाका सुरु! बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Maharashtra Live News Update: काँग्रेस नेते अतुल लोंढे यांना धमकीचा कॉल

Skin Care Tips: मेकअपशिवाय ग्लोइंग स्कीन हवीये, मग 'या' ५ गोष्टी नक्की कराच

SCROLL FOR NEXT