PM Modi Speech in Aero India 2023 saam tv
देश विदेश

PM Modi Speech: 'एरो इंडिया 2023' शो भारताच्या विकासाची गाथा', पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

Aero India 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंगळुरुच्या येलाहंका येथील हवाई दलाच्या स्टेशनवर 'एरो इंडिया 2023' च्या 14 व्या आवृत्तीचे उद्घाटन केले.

Chandrakant Jagtap

PM Modi Speech in Aero India 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एरो इंडिया 2023' च्या 14 व्या आवृत्तीचे बेंगळुरू येथील येलाहंका येथील हवाई दलाच्या स्टेशनवर उद्घाटन केले. भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी पंतप्रधानांसमोर सादर होणाऱ्या एअर शोमध्ये गुरुकुल फॉर्मेशनचे नेतृत्व केले. यावेळी कार्यक्रमात बोलताना मोदीं एरो इंडियाचा शो भारताची शक्ती असल्याचे म्हटले आहे.

पीएम मोदी म्हणाले, 'आजचा हा कार्यक्रम केवळ एक शो नाही, तर भारताची ताकद आहे. हा शो भारताच्या संरक्षण उद्योगाची व्याप्ती आणि आत्मविश्वास यावरही लक्ष केंद्रित करतो'. मोदी म्हणाले जेव्हा एखादा नवा विचार आणि नवीन दृष्टीकोन घेऊन पुढे जाऊ लागतो, तेव्हा त्याची व्यवस्थाही नव्या विचारांनी बदलू लागते. आजच्या घटनेतून भारताच्या नव्या विचाराचेही दर्शन घडते'.

पीएम मोदी म्हणाले, 'आज आपले यश भारताच्या शक्यता आणि क्षमतेचा पुरावा देत आहे. आकाशात गर्जना करणारे तेजस विमान हे 'मेक इन इंडिया'च्या यशाचा पुरावा आहे. 21व्या शतकातील नवा भारत कोणतीही संधी सोडणार नाही किंवा आपल्या मेहनतीत कोणतीही कसर सोडणार नाही'. (Latest Marathi news)

'हा कार्यक्रम आणखी एका कारणासाठी खूप खास आहे. तंत्रज्ञानाच्या जगात विशेष प्राविण्य असलेल्या कर्नाटकसारख्या राज्यात हे घडत आहे. हा कार्यक्रम एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रात नवीन संधी निर्माण करेल. कर्नाटकातील तरुणांसाठी नव्या शक्यता निर्माण होणार आहेत', असेही मोदी म्हणाले.

पीएम मोदी म्हणाले 'या वर्षीच्या कार्यक्रमाने मागील सर्व विक्रम मोडले आहेत आणि एमएसएमई, भारतीय स्टार्टअप्स तसेच जगभरातील प्रस्थापित कंपन्यांसह सर्व स्तरांतून सहभाग नोंदवला आहे. एरो इंडियाची थीम "द रनवे टू अ बिलियन'' अशी आहे. एरो इंडियाचा 2023 चा शो ही भारताच्या विकासाची गाथा आहे. यंदाच्या एरो इंडिया शोमध्ये 100 हून अधिक देशांचा सहभाग हा न्यू इंडियावरील जगाचा विश्वास दर्शवतो, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की 'अमृत काळा'तील भारत लढाऊ वैमानिकाप्रमाणे पुढे जात आहे, जो उंचीला स्पर्श करण्यास घाबरत नाही, जो सर्वोच्च उड्डाण करण्यास उत्सुक आहे. आजचा भारत जलद विचार करतो, दूरचा विचार करतो आणि झटपट निर्णय घेतो. याशिवाय ते म्हणाले की आणखी एक गोष्ट म्हणजे भारताचा वेग कितीही वेगवान असला तरीही तो नेहमी जमिनीशी जोडलेला असतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT