PM Modi Saam Digital
देश विदेश

Morbi Bridge Collapse: मोरबी पूल दुर्घटनेबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधील केवडिया येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवसात सहभागी झाले होते.

साम टिव्ही ब्युरो

अहमदाबाद : गुजरातमधील (Gujrat) मोरबी भागात रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. मच्छू नदीवरील एक तरंगता पूल कोसळला. ज्यामध्ये 131 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेबाबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) देखील भावुक झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधील केवडिया येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवसात सहभागी झाले होते. त्याआधी ते स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचले होते. तेथे बोलतांना मोदी भावुक झाले. (Latest News)

पीएम मोदी म्हणाले की, मी एकता नगरमध्ये आहे पण माझे मन मोरबीतील पीडितांशी जोडले गेलेले आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. सरकार प्रत्येक प्रकारे पीडित कुटुंबांच्या पाठीशी आहे.

गुजरात सरकार काल संध्याकाळपासून मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहे. केंद्र सरकारकडून गुजरात सरकारला सर्वतोपरी मदत केली जात आहे. NDRF आणि लष्कर तैनात आहे. PM मोदींनी आश्वासन दिले आहे की बचाव आणि मदत कार्यात कोणतीही कमी पडणार नाही.

मदतीची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली होती. याशिवाय गुजरात सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : फोन टॅपिंगनंतर आता मोबाईल सर्व्हिलन्स? बावनकुळेंच्या वक्तव्याने राज्यात खळबळ, VIDEO

Saturday Horoscope : विनाकारण कामांमध्ये येणाऱ्या अडचणीमुळे मनोबल कमी होईल; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Maharashtra Government : राज्यात बांगलादेशी घुसखोरांना आळा बसणार; फडणवीस सरकारने उचललं मोठं पाऊल

Satara News : डॉक्टर महिलेचे आरोपीसोबत १५० हून अधिक कॉल, आत्महत्येपूर्वी काय घडलं? पोलीस तपासात महत्वाची माहिती समोर

Manoj jarange: मनोज जरांगे पुन्हा मैदानात, शेतकरी संघटनांना जरांगेंची हाक

SCROLL FOR NEXT