Train Accident: Saam Tv
देश विदेश

Trains Collided In Bangladesh: बांगलादेशात मालगाडी अन् प्रवाशी रेल्वेचा अपघात; १५ जणांचा मृत्यू

Train Accident: किशोरगंजजवळ दोन रेल्वेचा अपघात झालाय. यात १५ जणांचा मृत्यू झालाय.

Bharat Jadhav

बांगलादेशाच्या राजधानी जवळ दोन रेल्वेची धडक होऊन अपघात झालाय. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाल्याची माहिती समोर आलीय. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी किशोरगंजच्या भैरब उपजिल्ह्यात एक प्रवाशी रेल्वेला मालगाडीने मागून धडक दिल्याने हा अपघात झालाय. (Latest News)

एएफपीच्या वृत्तानुसार, हा अपघात वेस्टर्न सिटी भैरबमध्ये झाल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलंय. आम्ही १५ जणांचा मृत्यू झालाय. प्रशासकीय अधिकारी असलेल्या सदीकौर रहमान यांनी ही माहिती दिली. ढाकापासून भैरब हे ६० किलोमीटर अंतरावर असून त्या ठिकाणी हा अपघात झाला. यात अपघातात १०० जण जखमी झालेत. रेल्वेचा अपघात दुपारी ४ वाजता झाला. एकाच रेल्वेरुळावर दोन्ही रेल्वे आल्याने हा अपघात झाल्याची माहिती रहमान यांनी दिलीय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, या भीषण अपघातानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. स्थानिक पोलीस अधिकारी सिराजुल इस्लाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांची संख्या वाढू शकते. तर बांगलादेशी टीव्ही चॅनेलनुसार, या रेल्वे अपघातातील मृतांची संख्या २० वर पोहोचलीय. भैरब रेल्वे पोलीस स्टेशनचे प्रभारी मोहम्मद अलीम हुसैन शिकदार यांनी सांगितले की,पॅसेंजर ट्रेन ढाकाकडे जात होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation : कुणबी दाखले दिले, व्हॅलेडिटीचं काय? हैदराबाद GRवरून मराठा संघटनांमध्ये वाद? VIDEO

Shani Gochar: दसऱ्यानंतर 'या' राशींच्या व्यक्तींवर पडणार पैशांचा पाऊस; शनीच्या नक्षत्र गोचरमुळे होणार मालामाल

Shocking: बायकोला खांबाला बांधलं, नवऱ्याकडून लाथाबुक्क्या अन् बेल्टने अमानुष मारहाण; मुलं विनवणी करत राहिले पण...

Traffic Block: वाहतूक कोंडीनं घेतला चिमुरड्याचा जीव; मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर २५ किलोमीटर वाहनांच्या रांगा

Vote Chori: राहुल गांधींचा नवा आरोप; राजुरात 6853 मतं वाढवल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT