पाकिस्तान दहशतवादाला पोसतंय; संयुक्त राष्ट्रात भारताचा हल्लाबोल twitter/ @ANI
देश विदेश

पाकिस्तान दहशतवादाला पोसतंय; संयुक्त राष्ट्रात भारताचा हल्लाबोल

जिनिव्हा येथे संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेच्या अधिवेशनात मिशन ऑफ इंडियाचे पहिले सचिव पवन कुमार बधे यांनी ही टिका केली केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : दहशतवादाला मदत करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी आता पाकिस्तानला जबाबदार धरण्याची वेळ आली आहे, अशी टिका भारताने केली आहे. जिनिव्हा येथे संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेच्या अधिवेशनात मिशन ऑफ इंडियाचे पहिले सचिव पवन कुमार बधे यांनी ही टिका केली केली आहे. अधिवेशनात काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्याबद्दल आणि भारताविरूद्ध निराधार आरोप करण्याबद्दल भारताने पाकिस्तानवर निशाणा साधला आहे.

दहशतवाद्यांना पाकिस्तान आसरा आणि पेन्शन

तसेच "दहशतवाद हा मानवाधिकारांचे घोर उल्लंघन आहे आणि सर्व प्रकारांवर कठोरपणे कारवाई करण्याची गरज आहे." असे मतही भारताने नोंदवले आहे. त्याचबरोबर भारतासह आसपासच्या देशांमध्ये दहशतवादी कारवाया करणाऱ्य़ा आपल्या हद्दीतील दहशतवाद्यांना पाकिस्तान आसरा देण्यासह पेन्शनही पुरवते. त्यामुळे अशा प्रकारच्या कारवायांसाठी पाकिस्तानला जबाबदार धरण्याची वेळ आली आहे.

जबरदस्तीने केले जाते धर्मांतरण

सचिव पवन कुमार बधे यांनी याबाबत परिषदेत भारताच्या वतीने भुमिका मांडली आहे. पाकिस्तानात, धार्मिक अल्पसंख्यांक मुली, महिलांचे जबरदस्तीने अपहरण, बलात्कार, धर्मांतरण केल्याच्या बातम्या पाहिल्या आहेत. पाकिस्तानात दरवर्षी धार्मिक अल्पसंख्याक असलेल्या 1000 हून अधिक मुलींचे जबरदस्तीने धर्मांतर केले जाते. पाकिस्तानात कठोर निंदनीय कायदे, जबरदस्ती धर्मांतरण आणि विवाह आणि अतिरिक्त न्यायालयीन हत्येद्वारे ख्रिस्ती, अहमदिया, शीख, हिंदूसह अल्पसंख्याकांचा पद्धतशीरपणे छळ करणे, अशा घटना पाकिस्तानाात सर्रासपणे घडत आहेत. पाकिस्तानमधील धार्मिक अल्पसंख्याकांच्या पवित्र आणि धार्मिक स्थळांवर हल्ले होण्याच्या आणि त्यांची तोडफोड करण्याच्या घटनाही त्या ठिकाणी सामान्य बाब झाली असल्याचे बधे यांनी म्हटले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT